शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

राहुल गांधीनी केले दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 12:07 PM

नायगाव येथील चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले, अमित देशमुख, आणि अन्य नेत्यांनी चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले.

नांदेड: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या नायगाव येथील निवासस्थानी भेट दिली. नायगाव येथील चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले, अमित देशमुख, आणि अन्य नेत्यांनी चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले. दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या प्रतिमेला काँग्रेस नेत्यांनी पुष्प अर्पण केले. यावेळी राहुल गांधी यांनी चव्हाण कुटुंबांची संवाद साधला. त्यानंतर राहुल गांधी, खर्गे आणि इतर नेते सांगली येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

१४ दिवस मृत्यूशी झुंज१३ ऑगस्ट रोजी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणाहून एअर ॲम्ब्युलन्सद्वारे त्याच दिवशी हैदराबाद येथे हलविण्यात आले. हैदराबाद येथील रुग्णालयात १४ दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर खा. वसंतराव चव्हाण १४ दिवस मृत्यूशी झुंज देत होते. अखेर २६ ऑगस्ट रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. वसंतराव यांच्यावर मंगळवार २७ ऑगस्ट रोजी शासकीय इतमामात नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या चाहत्यांनी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक दाखल झाले होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत आदरांजली वाहिली. पोलिस पथकाने तीन राऊंड झाडून सलामी दिली. पार्थिव देहास खा. वसंतराव चव्हाण यांचे धाकटे चिरंजीव रणजित चव्हाण यांनी अग्नी दिला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले व त्यांनी वसंतराव चव्हाण अमर रहे च्या घोषणा दिल्या.

काँग्रेसला नांदेड जिल्ह्यात संजीवनी देणारे खासदार वसंतराव चव्हाण १५ ऑगस्ट १९५४ ला जन्म झालेले वसंतराव चव्हाण यांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे वडील बळवंतराव चव्हाणांकडून मिळाले. १९७८ मध्ये ते नायगावचे पहिल्यांदा सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग २४ वर्षे ते या पदावर होते. १९९० मध्ये जिल्हा परिषदेत निवडून आले. त्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष, विविध सोसायट्यांचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले. २००२ मध्ये राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा विधान परिषद सदस्य म्हणून निवडून गेले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष निवडून आले. त्यानंतर २०१४ मध्ये काँग्रेसकडून त्यांनी नायगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपत गेल्यामुळे काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. अशावेळी भाजप उमेदवाराच्या तोडीस तोड म्हणून वसंतराव चव्हाण यांना काँग्रेसने रिंगणात उतरविले. त्यांच्या प्रकृतीबाबत टीकाटिप्पणी केल्यानंतर त्यांनी एखाद्या कसलेल्या पहिलवानासारखे भरसभेत दंड थोपटून आव्हान दिले होते, तसेच लोकसभेत प्रतापराव चिखलीकर यांचा तब्बल ५० हजारांहून अधिक मतांनी पराभव करीत काँग्रेसचा नांदेड गड शाबूत ठेवला होता. त्यांच्या या विजयामुळे काँग्रेसला जिल्ह्यात संजीवनी मिळाली होती. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNandedनांदेड