शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Sanjay Biyani Murder: ‘रिंधा कनेक्शन’ नसावे, पण तपासात हा मुद्दा पोलिसांनी साेडला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 18:58 IST

Sanjay Biyani Murder: संजय बियाणी यांच्या खुनाच्या घटनेनंतर आठवडा लाेटला तरी पाेलिसांच्या हाती अद्याप ठाेस काही लागलेले नाही.

नांदेड :  येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या खुनामागे (Sanjay Biyani Murder ) कुख्यात गुंड रिंधा याचा हात नसावा, अशा प्राथमिक निष्कर्षाप्रत पाेलीस आले आहेत. मात्र, तपासाचा हा मुद्दा पाेलिसांनी अद्याप साेडलेला नाही.

संजय बियाणी यांच्या खुनाच्या घटनेनंतर आठवडा लाेटला तरी पाेलिसांच्या हाती अद्याप ठाेस काही लागलेले नाही. प्रमुख दाेन - तीन मुद्द्यांवर तपास केला जात आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच गुंड रिंधा याचे नाव चर्चिले जाऊ लागले. या अनुषंगाने उच्चपदस्थ पाेलीस अधिकाऱ्याने ‘लाेकमत’ला सांगितले की, गुंड रिंधा याची पार्श्वभूमी, गुन्ह्याची पद्धत लक्षात घेता बियाणी प्रकरणात रिंधा नसावा, असे दिसते. नांदेडमध्ये प्रत्येक माेठ्या घटनेमागे रिंधाचे नाव पुढे करण्याचा जणू पायंडा पडला आहे. परंतु प्रत्यक्षात तसे नाही. मात्र, पाेलिसांनी रिंधा हा बियाणी खून प्रकरणातील तपासाचा अँगल अद्याप साेडलेला नाही. दाेन राज्यांत हा तपास केंद्रीत केला गेला आहे. त्यापैकी एका राज्यात पाेलीस पथक गेले असून, दुसऱ्या राज्यात लवकरच जाणार आहे. बियाणी यांच्या निकटवर्तीय मित्रांवरही तपासाचा एक फाेकस आहे. त्यांच्यात भांडण असले तरी ते खुनासारख्या टाेकाच्या निर्णयापर्यंत जातील, असे वाटत नसल्याचे सांगण्यात आले.

धमकी आलेल्या पाच व्यापाऱ्यांना पोलीस सुरक्षा  बियाणी यांच्या खून प्रकरणादरम्यान नांदेड शहरातील आणखी चार ते पाच व्यापाऱ्यांना धमक्या आल्या. त्यांना पाेलीस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी सतत त्यांच्या संपर्कात आहेत. पुन्हा फाेन आल्यास ताे कसा हॅंडल करायचा, याबाबत या व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. मात्र, पाचही व्यापाऱ्यांना आलेले फाेन हे संजय बियाणी यांच्या खुनाच्या घटनेनंतरचे आहेत. खुनानंतर निर्माण झालेल्या भीतीचा काहीतरी फायदा करून घेण्याच्या उद्देशाने हे फाेन काॅल केल्याचे स्पष्ट हाेते. खुनापूर्वी एक-दाेन काॅल आले. मात्र, ते पुन्हा आले नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बियाणी कुटुंबीयांचा असहकार पण टिका जोरातया पाेलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पाेलीस तपासात बियाणी कुटुंबातील सदस्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. त्याऐवजी ते पाेलिसांवर टीका करण्यात धन्यता मानतात. या कुटुंबीयांचे सहकार्य मिळाल्यास पाेलीस तपासाला गती येऊन मदतच हाेईल. अजूनही वेळ गेलेली नाही, बियाणी कुटुंबीयांच्या सहकार्याची, त्यांनी काही सांगण्याची पाेलिसांना प्रतीक्षा आहे.

खरे तेच समोर येईलसंजय बियाणी खून प्रकरणात गुन्हा तातडीने उघडकीस यावा म्हणून पाेलिसांवर सरकार, प्रशासन, जनता व विविध स्तरांतून दबाव आहे. मात्र, हा दबाव झुगारून पाेलीस यंत्रणा काम करीत आहे. दबाव आहे म्हणून प्रकरणात कुणालाही अथवा  चुकीच्या लाेकांना अडकविले जाणार नाही. थाेडा वेळ लागला तरी चालेल, टीका-दबाव सहन करू. पण, खऱ्या गुन्हेगारांनाच अटक केली जाईल. लवकरच पाेलीस बियाणींच्या खुन्यांना अटक करतील, असा विश्वास या उच्च पदस्थ पाेलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडDeathमृत्यू