शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

"जागा वाटप अजून सुरू झाले नाही, याबाबत लवकरच बैठक घेऊ", नाना पटोलेंची स्पष्टोक्ती

By शिवराज बिचेवार | Published: August 11, 2024 1:39 PM

"महाभ्रष्ट आणि मतिमंद सरकार आम्हाला घालवायचा, हा आमचा एकच उद्देश आहे."

शिवराज बीच्चेवार/

नांदेड- "जागा वाटपाची सुरुवात अजून झालेली नाही. महाविकास आघाडीचे सगळे नेते सध्या दौऱ्यावर आहेत. 16 तारखेला मुंबईत महाविकास आघाडीची जाहीर सभा आहे, त्यावेळी आम्ही जागा वाटपाच्या संदर्भातल्या बैठकीची तारीख निश्चित करू. मिरच्या आधारावर जागावाटप होईल. आमचा एकच उद्देश, महा भ्रष्ट आणि मतिमंद सरकार आम्हाला घालवायचा आहे," अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ते आज नांदेडमध्ये बोलत होते.

राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यादरम्यान जे घडलं त्यामागे उद्धव ठाकरे शरद पवार असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. या आरोपावर नाना पटेल यांनी मात्र कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. तसेच, "राज्यात कायदा सुव्यवस्था आणि नीतिमत्ता राहिली नाही. राज्यातले सरकार खोक्याचे सरकार आहे, बेईमान सरकार आहे, गुजरात धार्जिन सरकार आहे. सरकारमुळे कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. एखाद्या पक्षाच्या नेत्यावर कसा हमला केला जातो, हे आपण पाहिलेला आहे आणि तो पण ठाण्यामध्ये जिथे राज्याचे मुख्यमंत्री राहतात. ठाणे जिल्ह्यात अशी कृती होत असेल, तर ती अशोभनीय आहे. कुणी त्या कृतीचा समर्थन करू शकत नाही", असेही नाना पटोले म्हणाले. 

नांदेडमधील देगलूरचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर सध्या भाजप नेत्यांसोबत संपर्कात आहेत. याबाबत विचारले असता नाना पटोले म्हणाले, "राज्यसभा विधानसभेत ज्यांनी क्रॉस वोटिंग केली, त्यांची नावे आपल्याला तिकीट वाटपात कळतील. कोणालाही जबरदस्ती नाही, काँग्रेसमुळे ते आमदार झालेत , काँग्रेस विरोधात जायचे असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. देगलूरमध्ये लोक काँग्रेसच्या विचाराचे आहेत. कारवाई बाबत निर्णय ठरलेले आहेत, निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल," अशी प्रतिक्रिया नाना पटेल यांनी दिली.

तसेच, "परमजीत सिंग अधिकारी आहे, त्यांना भगोडा  जाहीर केले होते. चांदीवली आयोगाच्या समक्ष त्यांनी जे आरोप लावले होते ते सर्व आरोप त्यांनी परत घेतले होते. चांदीवली आयोगासमोर परमबीर सिंग बोलू शकले नाही, आता सरकारी पक्षाचे पोपट झाले आहेत. सरकार मूळ प्रश्नाकडे लक्ष देत नाही, परमबीर सिंग पोपट बनत असेल त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका", असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा