शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मन्याडच्या मातीला संघर्षाचा गंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:35 IST

मन्याड खोºयातील मातीला राजकीय संघर्षाचा गंध आहे. कंधार तालुक्यातील दोघांना स्वातंत्र्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत यश आले. १९७७ मध्ये केशवराव धोंडगे व २०१९ ला प्रताप पा.चिखलीकर यांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली.

ठळक मुद्देमन्याड खोऱ्याने दिले दोन खासदारकेशवराव धोंडगेंनंतर प्रताप चिखलीकर

गंगाधर तोगरे।कंधार : मन्याड खोºयातील मातीला राजकीय संघर्षाचा गंध आहे. कंधार तालुक्यातील दोघांना स्वातंत्र्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत यश आले. १९७७ मध्ये केशवराव धोंडगे व २०१९ ला प्रताप पा.चिखलीकर यांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, दोघांनीही कॉग्रेसच्या मातब्बर पुढाऱ्यांना पराभूत करण्याची किमया साधली.कंधार तालुक्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक संवर्धनाचा समृद्ध वारसा आहे. तसेच राजकीय संघर्षाने मन्याड खोरे सतत चर्चेत राहत आले आहे. भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी शेकापच्या माध्यमातून कॉग्रेस पक्षाविरोधात सतत संघर्ष केला. मन्याड खोºयात शेकापची मजबूत पकड निर्माण केली. त्यांना भाई गुरूनाथराव कुरुडे यांची साथ लाभली. त्यामुळे केशवरावांनी तीन दशके विधानसभेत या भागाचे प्रतिनिधित्व केले. तत्कालीन मुख्यमंत्री कै.शंकरराव चव्हाण यांच्यासोबत ते राजकीय संघर्ष करत राहिले. १९७७ ला केशवराव धोंडगे यांना नांदेड लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली.तुटपुंजी राजकीय रसद, प्रचाराची अपुरी साधने, वाहनांची वाणवा राहिली. परंतु कार्यकर्ते मात्र स्वखर्चाने पायाला भिंगरी बांधल्यासमान केशवरावांना विजयी करण्यासाठी फिरले. आणि केशवराव कॉग्रेस उमेदवाराविरोधात प्रचंड मतांनी विजयी झाले. हा कंधार तालुक्याला पहिला खासदार व लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान धोंडगे यांच्यामुळे मिळाला. चार दशकानंतर प्रताप पा. चिखलीकर यांच्या रुपाने २०१९ ला दुसºयांदा तालुक्याच्या भूमिपुत्राला संधी मिळाली.प्रताप पा. चिखलीकर यांची राजकीय जडणघडण कॉग्रेस पक्षात सुरूवातीच्या काळात झाली. गावचे सरपंच ते बारूळ, पेठवडज, कलंबर जि.प. सर्कलमधून विजयी होत राजकीय सत्तेत दमदार प्रवेश करत आपली धाडसी नेता अशी ओळख निर्माण केली. कॉग्रेसला बळकट करत असताना विधानसभेची उमेदवारी मागितली. परंतु उमेदवारी नाकारली तरी पक्षाचा आदेश मानत पक्ष उमेदवाराचा प्रचार केला. पुन्हा २००४ साली पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आणि विजयी होऊन राजकीय क्षमता सिद्ध केली.प्रताप पा.चिखलीकर हे एक अजब राजकीय रसायन आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहत काम करत राहिले. तरीही पक्षाने अन्याय केला तर काहीकाळ सहन करायचा.परंतु सतत अन्याय होत राहिला तर समर्थक, कार्यकर्ते यांच्याशी विचारविमर्श करत राजकीय निर्णय घ्यायचा. अशी अफलातून खुबी त्यांची राहत आली. शिवसेनेविरोधात राजकीय मतभेद झाले आणि भाजपाशी राजकीय सलगी वाढवत पक्ष मजबूत करण्यावर भर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मैत्री केली आणि धाडशी निर्णय घेत एकेकाळी असलेल्या मित्राविरोधात लोकसभा निवडणूक रिंगणात उडी घेतली. जिल्ह्यात राजकीय जाळे भक्कम असलेल्या व मॅनेजमेंट गुरू असलेल्या अशोकराव चव्हाण यांचा राजकीय चक्रव्यूह भेदण्याची किमया साधली. राजकीय संघर्ष मन्याड खोºयातला सतत चर्चेत असतो. त्यावर मात करत यशस्वी होणे ही या भागातील नेत्यांची विशेषत: आहे. तालुक्याने लोकसभेत मोठ्या संघर्षाने दोनदा संधी मिळवली. म्हणून मन्याड खोºयाला राजकीय संघर्षाचा गंध आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.विलासरावांच्या जवळीकतेमुळे तिकीट कापलेनिवडून आल्यानंतर कॉग्रेस-रा.कॉ. आघाडी सरकारला पाठिंबा दिला. कंधार-लोहा तालुक्याचा विकास करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांच्याशी जवळीक साधली. परंतु याची मोठी राजकीय किंमत त्यांना पुन्हा २००९ साली कॉग्रेसने उमेदवारी नाकारल्याने चुकवावी लागली.तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी चिखलीकर यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी कोणतीच कसर ठेवली नाही. चिखलीकर पराभूत झाले तरीही ते नव्या उमेदीने कार्यकर्त्याशी, जनतेशी कधी नाळ तुटू दिली नाही.२०१४ साली विधानसभा निवडणुकीत हाती धनुष्यबाण घेत झंझावात निर्माण केला. मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली तरीही चिखलीकरांनी मोठ्या फरकाने विजय मिळविला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९nanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपा