शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

'स्वारातीम' विद्यापीठाचा अजब कारभार, परीक्षेच्या दिवशी केंद्रावर देणार प्रवेश पत्र, परीक्षार्थीत संभ्रम

By श्रीनिवास भोसले | Updated: December 10, 2024 13:22 IST

परीक्षा विभाग म्हणते, परीक्षेपासून कोणीही वंचित राहणार नाही

नांदेड : स्वारातीम विद्यापीठाच्या १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षार्थ्यांना अद्याप प्रवेश पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे विद्यार्थीपरीक्षा कशी देणार? असा सवाल उपस्थित केला जात असताना परीक्षा विभागाने मात्र ऐन परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर प्रवेश पत्र दिले जातील, असा अजब फंडा अवलंबिला आहे. परीक्षा केंद्र, परीक्षा क्रमांक आदींची जुळवाजुळव करताना कोणी विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास जबाबदार कोण? असा सवालदेखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कार्यक्षेत्र नांदेडसह हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यात आहे. हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱ्या विद्यापीठाचा परीक्षा विभाग मात्र नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतो. मंगळवारी (दि.१०)पासून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरूवात होत आहे. यामध्ये एम. ए., बी. ए., बी. काॅम., बी.एसस्सी., एम. कॉम., एम.एसस्सी आदींच्या परीक्षा तसेच बहिस्थ: विभाग आणि बॅकलॉग आणि रेग्युलर विषयाच्या परीक्षांचा समावेश आहे. बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत हॉल तिकीटच पोहोचले नाही. त्यामुळे ऐनवेळी महाविद्यालयाच्या ओळखपत्र पाहून परीक्षेस बसू द्यावेत, अशा सूचना संबंधित प्राचार्य आणि परीक्षा केंद्रप्रमुखांना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिल्या आहेत. मात्र, ऐनवेळी विना हॉल तिकीट परीक्षा घेण्याची नामुष्की विद्यापीठावर का ओढावली, परीक्षा विभागाच्या या सावळ्या गोंधळाला कोण जबाबदार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

परीक्षार्थ्यांची मानसिकतेचे काय?विद्यापीठाने नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर जायचे, पण परीक्षेसाठी असणारा आसन क्रमांक नाही, कोणत्या विषयाचा पेपर ते माहीत नाही. ऐनवेळी परीक्षा केंद्र हॉल अन् आसन क्रमांक दिला जाणार, अशा संभ्रमावस्थेत गोंधळलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता राहणार का? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

परीक्षा विभागा गोंधळलापरीक्षा विभाग आणि एमकेसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने परीक्षेचे आयोजन केले जाते. प्राचार्यांच्या लॉगिनमधून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट केले जाते. परंतु, परीक्षा विभागाने सदर आवेदनपत्र तथा हॉल तिकीट प्राचार्यांच्या लॉगीनमध्ये अपलोड केले गेले नाहीत. त्यामुळे गोंधळलेल्या परीक्षा विभागाने ऐनवेळी महाविद्यालयाच्या ओळखपत्रावर परीक्षा घेण्याच्या लेखी सूचना संबंधित प्राचार्य आणि परीक्षा केंद्रचालकांना दिल्या आहेत.

काय म्हणतात परीक्षा विभागाचे संचालक...विद्यापीठाच्या हिवाळी-२०२४ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परीक्षा आवेदनपत्र सादर करूनही ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र अद्याप प्राप्त झालेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्याचे परीक्षा विभागाचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. ओळखपत्र पाहून विद्यार्थ्याची परीक्षा घेण्याचे अधिकार परीक्षा विभागाने परीक्षा केंद्रांना दिलेले आहेत.- हुशारसिंग साबळे, संचालक - परीक्षा व मूल्यमापन विभाग, स्वारातीम विद्यापीठ, नांदेड.

टॅग्स :swami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडEducationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थी