शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

... तर पथकप्रमुख जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:40 IST

उपलब्ध झालेले पाणी अवैधरित्या उपसा होऊ नये याची खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्त लहुराज माळी यांनी मंगळवारी दिले.

ठळक मुद्देअवैध उपसा रोखण्यासाठी पुन्हा कंबर कसली, दहा दक्षता पथके

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात उपलब्ध झालेला जलसाठा आता संरक्षित करण्याची जबाबदारी असून या पाण्यावर नांदेडकरांची तहान भागणार आहे. उपलब्ध झालेले पाणी अवैधरित्या उपसा होऊ नये याची खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्त लहुराज माळी यांनी मंगळवारी दिले. त्यातच उपसा झाल्यास पथक प्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा अवैध उपसामुळे झपाट्याने घटला. राजकीय दबावामुळे हा जलसाठा प्रशासन संरक्षित करु शकले नाही. याचा फटका सामान्य माणसाला बसला. राजकीय हेतूने अवैध उपसा करणाऱ्यावर कारवाई करु दिली नाही. परिणामी दक्षिण नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसंकट उभे राहिले आहे. त्यातच निसर्गानेही अवकृपा केली आहे. जुलैची १० तारीख उजाडली तरीही पाण्याचा थेंब नाही. विशेषत: दक्षिण नांदेडमध्ये निर्माण करण्यात आलेले राजकीय जलसंकट वरुण राजा कधी दूर करेल, याची प्रतीक्षा लागली आहे.विष्णूपुरी कोरडी पडल्याने सिद्धेश्वर प्रकल्पातून जवळपास १२० कि.मी. अंतरावरुन कॅनॉलमार्गे पाणी आणण्यात आले. १५ पैकी केवळ २.१७ दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पात पोहोचले आहे. सिद्धेश्वरमधून सोडण्यात येणारे पाणी १३ जुलै रोजी बंद होणार आहे. हा उपलब्ध जलसाठा संरक्षित करण्याची जबाबदारी आता प्रशासनावर आहे. हीच बाब ओळखून महापालिका आयुक्त माळी यांनी दक्षता पथकांची बैठक घेतली. या बैठकीत पाण्याचे महत्त्व विशद करताना पर्यायी मार्ग आता उपलब्ध नाही. त्यामुळे सिद्धेश्वरमधून आलेले पाणी जुलैअखेरपर्यंत कसे टिकवून ठेवता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.दक्षता पथकांनी अवैध पाणी उपसा करणाºयाविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.नदीपात्राच्या दोन्ही बाजूला चार-चार पथके राहणार आहेत तर दोन भरारी पथके आहेत. त्यासोबतच १३ जुलै रोजी सिद्धेश्वरमधून सोडण्यात येणारे पाणी बंद होणार आहे. त्यामुळे या भागात तैनात करण्यात आलेली पथकेही आता विष्णूपुरी प्रकल्पातील जतन करण्यासाठी तैनात करण्यात येणार आहे. एकूणच पाण्याचे महत्त्व आता प्रशासनाला उमगले आहे.विभागीय आयुक्तांनी फटकारलेविष्णूपुरी प्रकल्पातील अवैध पाणी उपशास जबाबदार कोण? या विषयावरुन राजकारण केले जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. डी.पी. सावंत यांनी पाणी जतन करण्यास जबाबदार असलेल्या अधिकाºयावर कारवाईची मागणी केली तर खा. हेमंत पाटील यांनी महापालिकेच्या नियोजनाअभावीच नांदेडवर जलसंकट ओढवल्याचे सांगितले. या अवैध पाणी उपसा रोखण्यास जबाबदार कोण? याची चौकशी विभागीय आयुक्त करतील, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.चौकशी सुरू होण्यापूर्वीच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हा प्रशासनाला फटकारताना डिसेंबरमध्ये ४२ दलघमी पाणी असताना ते पाणी गेले कुठे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या पत्रानंतर जिल्हा प्रशासनासह महापालिकाही खडबडून जागी झाली आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडcollectorजिल्हाधिकारीwater shortageपाणीटंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरण