शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

बारा वर्षांनंतर बाळ झालं अन् डोळ्यादेखत गेलं... नांदेडमधील मृत्यू तांडव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 05:40 IST

त्याचा जीव घेतला म्हणत बाळाच्या आईने हंबरडा फोडल्याने काळीज चर्रर्र झाले

श्रीनिवास भोसले

नांदेड : हातपाय वाकडे झाले... बाळाला झटके येत होते. बघा बघा म्हणून विनवण्या केल्या... तरी बघत नव्हते... या डॉक्टरांनी माझ्या बाळाचा जीव घेतला, म्हणत पैठणच्या एका मातेने हंबरडा फोडला. आक्रोश करणाऱ्या मातेला शांत व्हा, म्हणून धीर देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना, ‘मी कसं शांत राहू... मला १२ वर्षांनंतर बाळ झालं हाेतं. त्याचाही जीव घेतला हो...’, असे म्हणत या मातेने टाहो फोडला. या महिलेच्या आक्रोशाने उपस्थितांचे मन हेलावले. 

 पैठण येथील एका महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिच्या बाळाला नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. परंतु, गुरुवारी त्याचा झटके येऊन मृत्यू झाला. तब्बल बारा वर्षांनंतर जी स्त्री आई झाली, तिचे मातृत्व अवघ्या काही क्षणात हिरावल्याने होणाऱ्या वेदना तिलाच माहीत. मृत्यू सत्र कधी थांबणार, असा संतप्त सवाल  केला जात आहे.

दिल्ली वाऱ्या झाल्या असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नांदेडात येऊन मयत बालकांच्या आईचे दु:ख जाणून घ्यावे. एकप्रकारे सरकारने ही सर्वसामान्य मायबाप जनतेची केलेली हत्याच असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही दाखल करणार आहोत. या घटनेची जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

- सुुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

‘मंत्री साहेब, कुठंय औषधी...?’ 

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी नांदेड शासकीय रुग्णालयाला भेट दिल्यानंतर मुबलक औषधसाठा असल्याचा दावा केला होता. परंतु, आजही खासगीतून गोळ्या-औषधे आणायला लावली जात आहेत.

प्रशासन आणि शासनाच्या खोट्या आश्वासनांमध्ये रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये वैर निर्माण होत आहे. एकीकडे प्रशासन आणि शासन औषधसाठा असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे रुग्णालयात औषधे नसल्याने डॉक्टर, नर्स ती चिठ्ठीवर लिहून देत आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण होऊन नातेवाइक डॉक्टर, नर्सच्या अंगावर धाऊन येत आहेत.

‘आम्ही टीव्हीत पाहिलं... औषधे आहेत... तुम्ही का देत नाही...’ असे म्हणत रुग्णांचे नातेवाईक डॉक्टर आणि नर्स यांच्यासोबत वाद घालत आहेत.

न्यायालयीन चौकशी करा, दहा लाख द्या

मुंबई : राज्यातील शासकीय रुग्णालयात जवळपास १०० लोकांचे नाहक मृत्यू झाले आहेत, त्यात नवजात बालकांचाही समावेश आहे. सरकारी अनास्था व वैद्यकीय असुविधांमुळे हे मृत्यू झाले असून सरकार त्याबाबत गंभीर दिसत नाही.

नांदेड, छत्रपती संभाजीनगर व नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना सरकारने तातडीने १० लाख रुपयांची मदत द्यावी, तसेच राज्यपालांनी या संपूर्ण प्रकरणाची माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांना केली आहे.

काँग्रेस शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार हुसेन दलवाई, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, आमदार अमिन पटेल, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत, डॉ. राजू वाघमारे, संजय लाखे पाटील यांचा समावेश होता.

टॅग्स :NandedनांदेडSupriya Suleसुप्रिया सुळे