शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचा विश्वासू शिलेदार साथ सोडणार?; विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार
2
प्रेरणादायी! 'मोटरस्पोर्ट्स'साठी टेनिसपटूचं 'धाडस', तरूणाईसाठी उभारलं हक्काचं व्यासपीठ
3
विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजपाचे ३ नेते शर्यतीत; कोण मारणार बाजी?
4
चक्रीवादळ: बार्बाडोसमध्ये अडकलेली टीम इंडिया भारतात कधी येणार? मोठी अपडेट आली...
5
"मी शिवसैनिक, बोललो ते बोललो..."; आईवरून शिवीगाळ केल्याचं अंबादास दानवेंकडून समर्थन
6
India Vs Zimbabwe T20i Series 2024: टीम इंडिया नव्या परीक्षेसाठी झिम्बाब्वेला रवाना! शुबमन गिल संघाचा कॅप्टन, द्रविडच्या जागी कोण?
7
जनरल मोटर्स, फोर्ड आता फोक्सवॅगन! जगातील सर्वात मोठी कंपनी भारतात अपयशी ठरली 
8
"आज ते नाहीत, याचं मला खूप शल्य राहील...", विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावुक!
9
Video - "पत्र्याच्या घरात राहणारी मुलगी आज..."; रुपाली भोसलेने नवं घर घेताच गौरी कुलकर्णी भावुक
10
Priyanka Gandhi : "BJP-RSS चं काम हे फक्त हिंसा, द्वेष आणि भीती पसरवणं..."; प्रियंका गांधी कडाडल्या
11
धक्कादायक! मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या ठिकाणाची ड्रोनद्वारे टेहळणी
12
बहुप्रतिक्षित 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये या लोकप्रिय मराठी कलाकाराची एन्ट्री, डबिंगही केलं पूर्ण
13
"लोकांना तुमच्यापेक्षा जास्त विश्वास पंचायतमधल्या सरपंचावर'; निवडणूक आयोगावर खासदाराचे ताशेरे
14
"सत्ताधाऱ्यांना संरक्षण मागावं लागल्याचे देशाने पाहिलं"; राहुल गांधींच्या विधानाचे राऊतांकडून समर्थन
15
राहुल गांधींनी सर्व हिंदूंची माफी मागावी, चित्रा वाघ यांची मागणी
16
थलायवासोबत 40 वर्षांपासून काम केलं नाही, कमल हसन यांनी सांगितलं कारण; म्हणाले...
17
उद्धव ठाकरेंच्या शिलेदारामुळे सगळ्यांचंच गणित बिघडणार; मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेच्या रिंगणात?
18
'या' दिग्दर्शकाला पाहून शाहरुखला आली 'क..क..क..किरण' बोलण्याची कल्पना; जुही चावलाचा खुलासा
19
"शिवीगाळ झाल्यामुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही"; दानवेंच्या निलंबनाची प्रसाद लाड यांची मागणी
20
Divine Power IPO: पहिल्याच दिवशी ३००% चा फायदा, ४० रुपयांचा शेअर १६० पार; गुंतवणूकदार मालामाल

दोन दिग्गजांनी बनविला ‘भारत जोडो’चा रोड मॅप! १२ राज्ये अन् दाेन केंद्रशासित प्रदेशांचा असा केला गेला अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 6:38 AM

देशाच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारी ते उत्तर टोकाच्या श्रीनगर-काश्मीरपर्यंत तब्बल तीन हजार ५७० किलोमीटरच्या या यात्रेचे नियोजन

नांदेड :

तब्बल तीन हजार ५७० किलोमीटरचा पायी प्रवास... १५० दिवसांचा मुक्काम. राज्यपरत्वे बदलणारे हवामान, जंगल, डोंगरदऱ्या आदींचा अभ्यास करून ‘भारत जोडो’ यात्रेचा रोड मॅप बनविला आहे, तो काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी. त्यामुळेच त्यांना खासदार राहुल गांधीची टीम ‘भारत जोडो’चे आर्किटेक्ट म्हणून संबोधतात.  

देशाच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारी ते उत्तर टोकाच्या श्रीनगर-काश्मीरपर्यंत तब्बल तीन हजार ५७० किलोमीटरच्या या यात्रेचे नियोजन करताना दररोजचे पायी चालत जाणारे अंतर, होणारे मुक्काम आदी बाबींचा विचार करून रोड मॅप बनविण्यात आला आहे. खासदार राहुल गांधी यांच्याशी सल्लामसलत करून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि दिग्विजय सिंह यांनी या यात्रेचे नियोजन केले आहे. कोणत्याही आव्हानांचा सामना करत ही यात्रा देशाच्या वरच्या टोकाला असलेल्या श्रीनगरमध्ये तिरंगा ध्वज फडकावूनच थांबेल, असा विश्वास काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. कोणतीच शक्ती- आंधी या यात्रेला रोखू शकत नाही, असे ते सांगतात. 

१५० दिवसांची पदयात्राखासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे. ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल झाली असून, आजपर्यंत ६३ मुक्काम झाले आहेत. १५० दिवसांच्या पदयात्रेत देशभरातील १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असेल.

मराठवाडा- विदर्भाला दिले प्राधान्य भारत जोडो यात्रेचा मॅप तयार करताना महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भाला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळते. मराठवाड्यातील दोन जिल्हे आणि विदर्भातील वाशीम, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांतून ही यात्रा जात आहे. राज्यात काँग्रेसची पीछेहाट होत असताना नांदेड जिल्ह्याने नेहमीच काँग्रेसची साथ दिली आहे. राज्यातील एकूण २८८ पैकी ४४ जागी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यात तब्बल २३ आमदार हे मराठवाडा आणि विदर्भातील आहेत. त्याच मार्गाने अथवा विधानसभा मतदारसंघातून भारत जोडो यात्रा जात असल्याने निश्चितच विद्यमान आमदारांना फायदा होईल, असे मानले जात आहे.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी