शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

जरांगे पाटलांना ठाकरे गटाच्या खासदाराचा उघड पाठिंबा; म्हणाले, "शेवटपर्यंत त्यांच्यासोबत आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 14:07 IST

हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन चालू आहे. प्रशासन मात्र याची दखल घेत नाही. सध्या प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. त्यांचा अजून सत्तेचा माज गेला नाही. - आष्टीकर

मविआमध्ये जागावाटपाबाबत बोलणी सुरु होणार आहेत. अशातच संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करावा असे म्हणत चर्चेला तोंड फोडले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने यावर नकार कळविला असून निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवू अशी भुमिका घेतली आहे. यातच आता ठाकरे गटात उमेदवारी मिळविण्यासाठी नेते प्रयत्न करू लागले आहेत. ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि ठाकरेंचा माजी खासदार सुभाष वानखेडे यांना तिकीट मिळू नये अशी मागणी केली आहे. 

महाविकास आघाडीकडून प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेचे तिकीट मिळू नये, असे माझे मत असल्याचे आष्टीकर म्हणाले. तसेच ठाकरे गटाचे नेते माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी लोकसभेला पक्ष विरोधी काम केले आहे. त्यांना देखील विधानसभेचे तिकीट मिळणार नाही. ज्या दिवशी वानखेडे तिकीट मागतील तेव्हा त्यांची तक्रार पक्षाकडे करणार. पक्षविरोधी कारवाई केल्यानंतर उबाठा  गटातून उमेदवारी मिळत नाही, हे लोकांना समजायला हवे, असे आष्टीकर म्हणाले. 

हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन चालू आहे. प्रशासन मात्र याची दखल घेत नाही. सध्या प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. त्यांचा अजून सत्तेचा माज गेला नाही. शेतकऱ्यांना तो उतरवावा लागेल आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असा इशारा आष्टीकर यांनी दिला. या सरकारला दोनच महिने शिल्लक आहेत, काहीही घोषणा करायला काय हरकत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी अर्थसंकल्पावर दिली. 

6 जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता संवाद रॅलीला सुरुवात होणार आहे. मी त्यांच्यासोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबत आहे असे देखील आष्टीकर म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षण