शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

विष्णूपुरी जलाशय १०० टक्के भरला; नांदेडला तीन दिवसांआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 19:40 IST

विष्णूपुरी जलाशय तुडुंब भरल्याने टंचाईचे संकट टळले

ठळक मुद्देमहापालिकेचा निर्णयपाण्याचे महत्त्व ओळखून काटकसरीने वापर करा

नांदेड :  मागील आठ महिन्यांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या नांदेडकरांना आता तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे़ विष्णूपुरी जलाशय १०० टक्के भरल्याने महापालिकेने शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे़ यासंदर्भात मंगळवारी अधिकृत पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रसिद्ध केले जाणार आहे़ त्यानंतर तीन दिवसांआड पाणी सोडण्यात येणार आहे़ विघ्नहर्त्या बाप्पांच्या आगमनासोबतच पाण्याचे संकट दूर झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला़  

मागील वर्षी अल्पपावसामुळे  पाणीटंचाईचा सामना करावा लागला़ विष्णूपुरी जलाशयात उपलब्ध असलेले पाणी अवैध उपशामुळे जानेवारी, फेब्रुवारीतच कमी झाले़ त्यामुळे नांदेड शहराला मार्चपासून पाच दिवसांआड व   एप्रिल, मे, जून, जुलै, आॅगस्ट महिन्यात  सहा ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता़ त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या झळा पावसाळ्यातही कायम होत्या़ अर्धा पावसाळा संपला तरी विष्णूपुरी जलाशयात पुरेसा साठा उपलब्ध झाला नव्हता़ 

मागील तीन महिन्यांत केवळ ४५ टक्के  पाऊस झाल्याने नदी- नाले, धरणे, बंधारे कोरडेच होते़ तर दुसरीकडे नांदेड शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी जलाशयात केवळ १७ दलघमी पाणी उपलब्ध झाले होते़ पावसाचे प्रमुख नक्षत्रे कोरडेच गेल्यामुळे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते़ दरम्यान, जायकवाडी धरण पूर्ण भरल्यामुळे या पाण्याची प्रतीक्षा करण्यात येत       होती़ परंतु, जायकवाडीचे पाणी विष्णूपुरी जलाशयातपर्यंत पोहोचले नाही़

जायकवाडीच्या पाण्याचा लाभ ढालेगाव व विटा बंधाऱ्यापर्यंत झाला़ दिवसेंदिवस पाणीटंचाईचे संकट गडद होत होते़ ऐन पावसाळ्यात नागरिक पाण्यासाठी भटकंती करताना दिसत होते़  आठवड्यात एक वेळेस  येणाऱ्या टँकरवर पाण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती़  मागील दहा, पंधरा वर्षांत प्रथमच पाणीटंचाईचे गंभीर संकट नांदेडकरांनी अनुभवले होते़ त्यामुळे विष्णूपुरी जलाशयात कधी पाणी उपलब्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते़ अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे विष्णूपुरी भरण्याची आशा मावळली होती़ त्यामुळे विष्णूपुरी जलाशयात असलेल्या पाण्याचे काटकसरीने नियोजन केले होते़ आठ दिवसांत एक वेळेस पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्याचा संचय करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता़ मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पाण्यासाठी वैतागलेल्या नागरिकांना मोठा दिलासा दिला़  गोदावरी नदीक्षेत्रात या पावसाळ्यात प्रथमच दमदार पाऊस झाल्याने विष्णूपुरी जलाशयात पाण्याचा येवा सुरू झाला़ सोमवारी  विष्णूपुरी जलाशय पूर्ण भरल्याने  नागरिकांनी आनंद व्यक्त केला़ 

पाण्याचे महत्त्व ओळखून काटकसरीने वापर कराच्पाण्यासाठी होरपळून निघालेल्या नागरिकांना आता तीन दिवसांआड पाणी मिळणार आहे़ यासंदर्भात महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले, विष्णूपुरी जलाशय शंभर टक्के भरल्याने नांदेड शहराला आता तीन दिवसांआड पाणी सोडण्यात येणार आहे़ यासंदर्भात मंगळवारी अधिकृत घोषणा होवून या निर्णयाची अंमलबजावणी होईल़ नागरिकांनी पाण्याचे महत्त्व ओळखून यापुढे पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले़ 

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाWaterपाणी