शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:54 IST

मार्च महिन्यापासून उन्हाची तिव्रता वाढली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. शिवाय ढगाळ वातावरण असल्याने उकाडा जाणवत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पाणीटंचाई वाढली आहे.

ठळक मुद्देकळमनुरी : आराखड्याला निवडणुकीचा खोडा

कळमनुरी : मार्च महिन्यापासून उन्हाची तिव्रता वाढली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. शिवाय ढगाळ वातावरण असल्याने उकाडा जाणवत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पाणीटंचाई वाढली आहे. पं.स.ने बनविलेला संभाव्य पाणीटंचाई आराखडा कागदावरच असल्याचे दिसत आहे.तालुक्यातील ६० ते ७० गावांत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासन लोकसभा निवडणूकीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. पंचायत समितीने ४ कोटी ७३ लाखांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून तो मंजूरही करून घेतला आहे. टँकरने पाणीपुरवठा व अधिग्रहण वगळता इतर कोणत्याही पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना होत नाहीत.हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाईमुळे जारच्या पाण्याची मागणी वाढली असून त्यांचा धंदा मात्र सध्या तेजीत सुरू आहे. खरीप हंगामानेही यावर्षी दगा दिला. खाण्यासाठी अन्न व पिण्यासाठी पाणी नसल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. तात्पुरती पूरक नळयोजना, नळ योजना दुरूस्ती, विधन विहिरीची दुरूस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे, विहीर खोल करणे, गाळ काढणे आदी कामांना संभाव्य आराखड्यात मंजुरी मिळाली आहे. परंतु ही कामे अजूनही कागदावरच आहे. त्यामुळे अनेक गावांत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून तालुक्यातील नांदापूर येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत ६८ लाखांचे नळ योजनेचे काम सुरू आहे. निवडणूकीच्या कामामुळे पाणीटंचाईकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे तालुक्यात दुष्काळ व पाणीटंचाईची दाहकता वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.अधिग्रहण प्रस्ताव : मंजुरी मिळूनही धूळ खातसध्या तालुक्यातील शिवणी खु., माळधावंडा, हातमाली, पाणबुडीवस्ती, पोत्रा, सिदगी, महालिंगीतांडा, कुपटी या आठ गावांना १० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ४० गावांत ५० अधिग्रहणाला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. अजूनही १५ ते २० अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या हंगामात ७९ टक्केच पाऊस पडला. आॅगस्ट महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने जलस्त्रोत कोरडे ठाक पडले आहेत. तालुक्यात पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.३५ नळ योजना बंदतालुक्यातील ३५ नळ योजना किरकोळ दुरूस्तीअभावी बंद आहेत. तालुक्यात एकूण १ हजार ७५ हातपंप असून त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त हातपंप किरकोळ दुरूस्तीअभावी बंद आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई