शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

आराेग्य विभागाच्या पद भरतीतील गुणवत्ताधारकांचे काय करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:14 AM

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून २८ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. मात्र, ...

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून २८ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. मात्र, पुढे कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा लांबणीवर पडल्या. दरम्यान, ९ सप्टेंबर २०२० रोजी मराठा आरक्षणाला सर्वेाच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजावर अन्याय होऊ नये यासाठी आरक्षणाच्या अंतिम निर्णयापर्यंत मूळ जाहिरातीच्या ५० टक्के जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर दोन वर्षांनंतर २८ फेब्रुवारी २०२१ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने परीक्षा घेतली. मात्र, त्यातील ५० टक्के म्हणजेच ३ हजार २७७ पदांवरच नियुक्ती देण्यात आली होती. त्यातील उर्वरित ५० टक्के विद्यार्थी हे मेरिटमध्ये आल्यानंतरही त्यांना डावलल्याचा आरोप पात्र विद्यार्थ्यांनी केला. यावर शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी व उर्वरित ५० टक्के जागाही भराव्यात यासाठी किशोर खेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याच प्रकरणात आणखी ४३ मुलांचे ६ प्रकरणेही एकत्रित करण्यात आले आहे. पुढील सुनावणी १६ जुलैला सुनावणी होणार आहे.

या भरती परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील वृषाली सुन्नेवार या राज्यात प्रथमस्थानी आल्या होत्या. मात्र, त्यांनाच अद्याप नियुक्ती मिळाली नाही. इतर पात्र उमेदवारही नियुक्तीपासून वंचित राहिले आहेत. अर्ज, निवेदनानंतर आता या उमेदवारांनी न्यायालयीन लढाईला प्रारंभ केला आहे. १६ जुलैला होणाऱ्या सुनावणीत राज्य शासन या मेरिटमध्ये आलेल्या उमेदवारांबाबत नेमकी कोणती भूमिका मांडते याकडे लक्ष लागले आहे.