शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
2
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
3
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
4
IND vs PAK: टॉस जिंकून पहिली बॅटिंग की बॉलिंग? भारत-पाकिस्तान मॅचसाठी कसं असेल पिच?
5
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
6
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
7
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
8
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
9
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
10
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
11
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
12
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
13
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
14
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
15
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
16
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
17
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
18
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
19
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
20
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?

"नरेंद्र मोदी जेव्हा आईला भेटतात तो इव्हेंट, राहुल गांधींची यात्रा म्हणजे मूव्हमेंट"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 8:00 PM

नाना पटोले यांनी नांदेडमध्ये बोलताना म्हटले की, राहुल गांधींनी कन्याकुमारीतून आपल्या भारत जोडो यात्रेला सुरुवात केली.

नांदेड - काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा आज नांदेड शहरात दाखल झाली. यावेळी त्यांच्या साथीला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिसून येत आहेत. राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहभागाने यात्रेत उत्साह संचारला होता. राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आज नांदेडमध्ये दाखल झाले असून महाराष्ट्रातील राहुल गांधींची पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये होत आहे. या सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच, राहुल गांधींच्या एनर्जीचं कौतुक करताना, यात्रेतून त्यांनी तरुणाईला दिलेल्या संदेशाला सलाम केला आहे. 

नाना पटोले यांनी नांदेडमध्ये बोलताना म्हटले की, राहुल गांधींनी कन्याकुमारीतून आपल्या भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. त्यावेळीच त्यांनी देशाला संदेश दिला होता. भारत जोडो यात्रा ही राजकीय नसून देशाला एकतेत जोडण्यासाठी निघालेली चळवळ आहे. त्यांच्या या यात्रेतून तरुणाईला एक प्रेरणा मिळाली आहे. सकाळी लवकर उठून ते यात्रेची सुरुवात करतात. त्यामुळे, तरुणाईही लवकर उठून यात्रेत सहभागी होत आहे. सदृढ शरीर आणि आरोग्य हीच संपत्ती आहे. राहुल गांधींनी आपल्याला ती संपत्ती टिकवण्याचा मंत्र दिल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं. 

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही एकच चळवळ आहे. इतर नेते जे करतात तो इव्हेंट असतो आणि ही यात्रा म्हणजे मूव्हमेंट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा आईला भेटायला जातात, तेव्हा त्यांचा चेहरा कुठे असतो, मोदींचा चेहरा कॅमेऱ्याकडे असतो. मात्र, आपण सर्वांनीच पाहिलं आहे. भारत जोडो यात्रेत जेव्हा सोनिया गांधींनी सहभाग घेतला. त्यावेळी सोनिया गांधीच्या पायातील बुटाची लेस निघाली होती. राहुल गांधींनी खाली वाकून आईच्या पायातील बुटाची लेस बांधली. त्यावेळी, राहुल गांधींचा चेहरा कुठे होता, आपण सर्वांनीच पाहिलंय, राहुल गांधींचा चेहरा त्यांच्या आईच्या पायाशी होता, असे म्हणत नाना पटोले यांनी इव्हेंट आणि मूव्हमेंटमधील फरक सांगितला.

यात्रेत राष्ट्रवादीचा सहभाग

नांदेड शहरात आज दुपारी पदयात्रा दाखल झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसचे नेते खा. सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी यात्रेत सहभाग घेतला. त्यांच्या सहभागाने यात्रेस आणखी बळ मिळाल्याचे चित्र होते. खा. सुळे आणि जयंत पाटील यांनी यात्रेकरुंसोबत संवाद साधला. खा. सुळे मनमोकळ्या संवादासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांची गर्दी होती. यात्रा शिवाजी नगर येथे आली असता खा. सुळे यांना समोरील मार्गात प्लास्टिकचा बॅगचा कचरा दिसला. सर्वजण त्यावरून जात असताना खा. सुळे यांनी ती बॅग खाली वाकून उचलली. खूप गर्दी असतानाही रस्त्यात पडलेला कचरा दिसताच एक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडत त्यांनी सहज प्लास्टिक बॅग उचलली. त्यांच्या या छोट्या कृतीने सहभागी सर्वांना मोठा संदेश दिला आहे. साधेपणासोबत खा. सुळे यांच्या जागरूकतेची चर्चा यानिमित्ताने यात्रेकरूंमध्ये सुरु होती.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNandedनांदेडNana Patoleनाना पटोलेNarendra Modiनरेंद्र मोदीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा