शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

मदत वाऱ्यावर, रिक्षाचालकांना दीड हजार रुपये कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:18 AM

कोरोना महामारीमुळे यंदाही रिक्षाचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षभरापासून लाॅकडाऊनच्या दुष्टचक्रात अडकलेल्या रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

कोरोना महामारीमुळे यंदाही रिक्षाचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षभरापासून लाॅकडाऊनच्या दुष्टचक्रात अडकलेल्या रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, रिक्षाचालकांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. १४ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिक्षाचालकांना दीड हजार रुपये देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार २० एप्रिल रोजी परिवहनमंत्र्यांनी रिक्षाचालकांना अर्थसाहाय्य देण्यासाठी रिक्षा पदाधिकारी व परिवहन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपये देण्यासंबंधी नियोजन केले होते. मात्र, या घटनेला आता जवळपास २५ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही. रिक्षाचालक निधीची प्रतीक्षा करीत आहेत.

चौकट- रिक्षाचालकांच्या प्रतिक्रिया

१. मागील दोन महिन्यांपासून रिक्षा व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने दीड हजार रुपये अत्यंत तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. तीसुद्धा वेळेवर दिली जात नाही. सगळेच अवघड झाले आहे. - मुखीद पठाण, पीरबुऱ्हाणनगर

२. मागील वर्षापासून ऑटोरिक्षा चालकांवर वाईट वेळ आली आहे. आमचे पोट तीन चाकावर आहे. मात्र, तेच बंद आहेत. त्यामुळे आमचे कुटुंब कसे जगवायाचे हा गंभीर प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. या काळात कोण किती मदत करणार. त्यामुळे शासनाने तातडीने मदत करावी. - माणिक भालेराव, महेबूबनगर.

३. राज्यातील प्रत्येक रिक्षाचालक शासनाच्या अनुदान निधीची आतुरतेने वाट पाहत आहेत. रिक्षाचालकांची आर्थिक परिस्थिती दयनीय झाली आहे. दुसरीकडे कर्ज घेतलेल्या रिक्षाचालकांना हप्ते कसे फेडायचे, हा प्रश्न गंभीर वाटत आहे. त्यामुळे शासनाने रिक्षाचालकांसाठी भरीव मदत करावी. - अहेमद बाबा, जिल्हाध्यक्ष, टायगर रिक्षा संघटना, नांदेड.

४. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयभीत वातावरण झाले आहे. बाहेर पडावे तर कोरोनाची भीती, घरात बसावे तर पोटाची काळजी, अशा परिस्थिती जगायचे कसे, याचा मार्ग सापडत नाही. अशा वेळी शासनाने तातडीने मदत करणे गरजेचे आहे. - रमेश भालेराव. तरोडा खु., नांदेड.