शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

देशात आरडीएक्स आलं कुठून? राज ठाकरेंचा मोदींना सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 19:54 IST

सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर जो हल्ला झाला. त्यात देशाचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यात वापरण्यात आलेलं आरडीएक्स देशात आलं कुठून याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावं.

नांदेड - काँग्रेस सरकार जेव्हा सत्तेत होतं तेव्हा नरेंद्र मोदी विरोधात असताना म्हणत होते आपल्या देशाची सीमा सुरक्षित ठेवणं सरकारची जबाबदारी असते. देशात आरडीएक्स आलं कुठून असा सवाल तुम्ही विचारत होता. आज तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर जो हल्ला झाला. त्यात देशाचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यात वापरण्यात आलेलं आरडीएक्स देशात आलं कुठून याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावं असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेडमध्ये विचारला. गुढीपाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरे यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली सभा नांदेडमध्ये पार पडत आहे. 

यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की,  मी ४ वर्षांपूर्वी बोललो होतो की निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. ते आज खरं ठरतंय. बालाकोट हवाई हल्ल्यात शत्रू राष्ट्राचे किती सैनिक मारले गेले ह्याचा आकडा हवाई दलाच्या प्रमुखांकडे पण नाहीत पण अमित शाह म्हणाले २५० माणसं मारली गेली. अमित शाहना कुठून मिळाला हा आकडा? देशाच्या सैन्यावर पूर्ण विश्वास आणि त्यांचा अभिमान आहे मात्र कुठे बॉम्ब टाकायचा असतो यासाठी विमानं प्रोग्रॅम्ड असतात, पायलट बघत नसतो, वैमानिकांना चुकीची माहिती दिली असा आरोप राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर केला. 

भारतीय जनता पक्षाचे एक नेते म्हणतात की, सैन्याच्या कारवाईचे पुरावे जरी शहिदांच्या नातेवाईकांनी मागितले तर ते देशद्रोही आहेत. योदी आदित्यनाथ आपल्या सैन्याला 'मोदी सेना' म्हणतात, सरकार जवानांना वापरुन घेत आहेत. परवा नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले तेव्हाही मोदींनी शहीद जवानांचा वापर करत लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. हेच भाजपाचे राजकारण आहे असा आरोप राज यांनी केला. 

संपूर्ण बहुमताचं सरकार देशाने मोदींच्या हातात दिलं पण त्यांनी काय केलं? नोटबंदी आणली, आधी एफडीआयला विरोध केला आता एफडीआय आणलं, जीएसटीला विरोध केला आणि आता जीएसटी आणून छोट्या व्यापारांच कंबरडं मोडलं. मोदी फक्त पंडित नेहरू, इंदिरा गांधींबद्दल बोलत आहेत. बेरोजगार तरुणांबद्दल कधी बोलणार? महिला सुरक्षेबद्दल कधी बोलणार? शेतकरी आत्महत्येबद्दल कधी बोलणार? असाही सवाल राज यांनी मोदींना केला.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीnanded-pcनांदेडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019