शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

मरण स्वस्त झाले? नांदेडमध्ये दररोज अपघातात जातोय एकाचा बळी

By प्रसाद आर्वीकर | Published: October 02, 2022 6:44 PM

घरातून बाहेर पडल्यानंतर घरी सुरक्षित पोहचूत की नाही, अशी परिस्थिती सध्या नांदेड शहरात निर्माण झाली आहे.

नांदेड: घरातून कामाच्या ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणावरून घरी सुरक्षित पोहचूत की नाही, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. सरत्या आठवड्यात मनाला वेदना देतील असे पाच अपघात झाले. छोट्या अपघाताची तर गिणतीच नाही. आठ दिवसांत पाच अपघातात ९ जणांचा बळी गेला आहे. सरासरी दररोज एक अपघात बळी जात असल्याने मरण का स्वस्त झाले? असा प्रश्न उपस्थित होतोय. यंत्रणेला दोष द्यायचा की स्वतःला ? यावर आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सरत्या आठवड्यात शनिवारची ती रात्र गावाकडे परतणाऱ्या मजुरांसाठी काळरात्र ठरली. हिमायतनगर तालुक्यात कामाच्या शोधात आलेले पश्चिम बंगालचे मजूर ट्रकने गावाकडे परत जात होते. त्याचवेळी समोरुन आलेल्या ट्रकची आणि मजुरांच्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन पाच मजूर ठार झाले. 

याच आठवड्यातील पार्डीचा  अपघात तर अनेकांच्या मनाला चटका लावणारा ठरला. भरधाव वेगातील ट्रकने रस्त्याशेजारच्या घरात घुसून एका युवतीला चिरडले. उच्च शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या वर्षा माणिक मदने हिला कोणताही दोष अथवा चूक नसताना अपघात बळी ठरावे लागले, ही बाब दुर्दैवीच आहे.

या दोन मोठ्या अपघातांसह हदगाव तालुक्यात बस टेम्पोवर धडकून मजुराचा मृत्यू, मुखेड तालुक्यातील जांब येथे बस दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू आणि भोकर तालुक्यात बारडजवळ ट्रक-दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू असे पाच अपघात झाले असून, त्यात ९ जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत.

मागील काही वर्षात रस्ते अपघात वाढले. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. रस्ते अपघातांची कारणमीमांसा केली तर अनेक वेगवेगळी कारणे समोर येतील. कोणी खराब रस्त्यांचे कारण पुढे करेल तर कोणी वाहनांच्या अतिवेग, चालकाचा निष्काळजीपणा, यंत्रणेचे दुर्लक्ष, कालबाह्य वाहनांचा वापर, अशी कितीतरी कारणे देऊन वेळ मारून नेली जाईल. पण त्याने गेलेला जीव परत येणार का? याचे उत्तर नकारार्थीच मिळणार. त्यामुळे वाढत्या अपघातांवर सकारात्मक विचार करून यंत्रणा बदलायची की वाहतूक नियम पाळण्यासाठी आपण बदलायचे? याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

२३ ते ३० सप्टेंबरमधील अपघातदिनांक           मयत  जखमी२४ सप्टेंबर         ५      ५२६ सप्टेंबर         १      १४२६ सप्टेंबर         १      ०२७ सप्टेंबर         १       ०१९ सप्टेंबर         १       १एकूण                ९      १५

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड