शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

व्हिलेज कोड न मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील ५२ गावे विकासापासून वंचित

By मनोज शेलार | Published: January 27, 2024 5:29 PM

वर्षभरापासून मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गाव विकास रखडला आहे.

मनोज शेलार,नंदुरबार : जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींना महसुली गावांचा दर्जा मिळूनही त्यांना ऑनलाईन प्रणालीतील व्हिलेज कोड मिळाला नसल्याने या गावांना कुठलाही निधी मिळत नसल्याची स्थिती आहे. वर्षभरापासून मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गाव विकास रखडला आहे.

जिल्ह्यातील अति दुर्गम भागातील आदिवासी पाड्यांचा विकास जलद गतीने करण्यासाठी जिल्हाभरात ४४ नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली आहे. यातील १४ ग्रामपंचायतींचे विभाजन करण्यात आले आहे. मात्र या प्रक्रियेला एक वर्ष उलटले. तरी देखील या ग्रामपंचायतींना आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या महसुली गावांना अद्यापही व्हिलेज कोड मिळाला नाही. त्याचा विपरीत परिणाम आता गावांच्या विकासावर होताना पहायला मिळत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील मूळ ग्रामपंचायतींतून विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापित झाल्या आहेत. या नवीन स्थापित ग्रा. पं. अंतर्गत जवळपास ५२ महसुली गावे समाविष्ट असून नवीन ग्रामपंचायतीतील महसूल गावाचे व्हिलेज कोड एलजीडी पोर्टलवर व्हॅलिड झाले नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयानुसार १५ वित्त आयोग पीएफएमएस प्रणाली, जीपीडीपी प्रणाली, ऑनलाइन दाखले प्रणाली, ग्रामपंचायत कर्मचारी प्रणाली तसेच अनेक ‘ई’ प्रणालींमध्ये या ग्रामपंचायती उपलब्ध नसल्यामुळे गेल्या एक-दीड वर्षांपासून गावाविकासाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे गावात विकास कामाला ब्रेक लागला असून शासकीय कामे करण्यास खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत आलेला निधी जीपीडीपीनुसार खर्चही करता येत नाही. त्यामुळे एक-दीड वर्षापासून संबंधित ग्रामपंचायतींमध्ये विविध पायाभूत सुविधांची कामे होत नाहीत. त्यामुळे संबंधित ग्रामस्थ सरपंचांना वेठीस धरत असून या ग्रा.पं.मध्ये काम करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंच यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे या महसुली गावांना व्हिलेज कोड तत्काळ द्यावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारgram panchayatग्राम पंचायत