शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ग्रामपंचायत उमेदवारांना सतावतेय चिंता ऑनलाईन खर्च सादर करण्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना आधी निवडणूक अर्ज व इतर कागदपत्र ॲानलाईन सादर करतांना अनेक अडचणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना आधी निवडणूक अर्ज व इतर कागदपत्र ॲानलाईन सादर करतांना अनेक अडचणी आल्या. आता निवडून आल्यानंतर उमेदवारांना ॲानलाईन खर्च सादर करण्याची मोठी डोकेदुखी वाढली आहे.  ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल गेल्या आठड्यात लागला. निवडून आलेल्या उमेदवारांनी गावात, समाजात, नातेवाईक तसेच मित्रपरिवारात जल्लोष केला. आता उमेदवारांना ॲानलाईन खर्च सादर करण्यासाची डोकेदुखी वाढली आहे. ही किचकट बाब निवडून आलेल्या उमेदवारांना जिकरीची ठरत आहे. जिल्ह्याची परिस्थिती पाहता ऑनलाइन खर्च सादर करणे म्हणजे उमेदवारांसाठी तारेवरची कसरत आहे. निवडणुकीत उभे असलेल्या काही उमेदवारांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही तसेच आयोगाचे हे ॲप नवीन वर्जनच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होत आहे. उमेदवार सातवी पास असले तरी काही उमेदवारांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही.  खर्च कसा सादर करायचा या विवंचनेत आहेत.

एक हजार २२९ उमेदवारांनी केली होती उमेदवारी, निवडून आले ५३०या निवडणूकीत एकूण १ हजार २२९ उमेदवारांनी उमेदवारी केली आहे. यातील ५३० सदस्य निवडून आले आहेत. सुमारे १ हजारपेक्षा अधिक असलेल्या या उमेदवारांनी ॲप डाऊनलोड केले असले तरीही ते भरावे कसे याची माहिती नसल्याने अडचणी येत आहेत.  अनेक ठिकाणी नेटर्वक नसल्याने उमेदवारांना माहिती भरणेही अवघड ठरत आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने ॲाफलाईन खर्च सादर करण्याची परवाणगी द्यावी अशी मागणी होत आहे. 

असा सादर करावा लागतो ॲानलाईन खर्चट्रू वोटर ॲप हे एका मोबाईलवर इन्स्टॉल केल्यानंतर दुसऱ्या मोबाईलवर उमेदवाराचा नंबर वापरून करता येणार नाही. कारण फक्त एकाच मोबाईलचा नोंदणी क्रमांक एका व्यक्तीकरिता करण्याची व्यवस्था आहे. शिवाय मोबाईलमध्ये भरपूर स्पेस असणे आवश्यक आहे. हे ॲप इन्स्टॉल करण्याअगोदर संबंधित उमेदवाराने ऑनलाइन नामनिर्देशन अर्ज भरलेला असणे आवश्यक आहे. प्रत्येक उमेदवाराला त्याच्या अँड्रॉइड मोबाईलवर हे ॲप इन्स्टॉल करून त्यात खर्च भरावा लागणार आहे.

या आहेत अडचणी...दुर्गम भागात गेल्या काही वर्षात मोबाईचा वापर वाढला असला तरी टूजी आणि थ्रीजी नेटर्वकही योग्य त्या प्रकारे चालत नसल्याने समस्या निर्माण होत आहे. यातून उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेकांना अडचणी आल्या होत्या. यामुळे आता निवडणूक खर्च कसा भरावा याबाबत विजयी आणि पराभूत उमेदवारांची घालमेल सुरु झाली आहे. 

दुर्गम भागात आधीच नेटवर्कची अडचण आहे. त्यात आवश्यक असलेला स्मार्ट फोन नाही. त्यामुळे खर्च कसा सादर करू हा प्रश्न आहे. त्यासाठी आता निवडणूक आयोगाने ऑफलाईन खर्च सादर करण्याची परवाणगी द्यावी. तसे झाल्यास सर्वच उमेदवार लागलीच खर्च सादर करण्यासाठी पुढे येतील व निवडणूक आयोगाचे कामकाजही सुटसुटीत होईल. -जे.पी.पाटील, निवडून आलेले उमेदवार.

 

उमेदवारी अर्ज सादर करतांनाच अनेकवेळा अडचणी आल्या होत्या. शेवटी निवडणूक आयोगाला ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुभा द्यावी लागली होती. आता खर्च सादर करण्यास देखील त्याच अडचणी येत आहेत. त्यामुळे नंदुरबारसारख्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन योग्य निर्णय घेणे अपेक्षीत आहे.-सुनिता जाधव, निवडून आलेल्या उमेदवार.