शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

मोकाट गुरांमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 1:20 PM

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद :  शहादा तालुक्यातील म्हसावद गावात व गावालगत मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे व वराहांचा त्रास ग्रामस्थांसह ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद :  शहादा तालुक्यातील म्हसावद गावात व गावालगत मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे व वराहांचा त्रास ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना होत असून, शेतात नुकसानही होत आहे. म्हसावद गावालगत असलेल्या पिंपरी येथील शेतकऱ्याच्या चार एकर उसापैकी चक्क दीड एकर ऊस या मोकाट गुरांनी फस्त करून नुकसान केले आहे. ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाने यावर उपाययोजना करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.म्हसावद गावालगत असलेल्या केळी व उसाच्या शेतात वराहांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. केळीच्या शेताला चोहोबाजूने तारेची जाळी बसवून कुंपण केले आहे. तरीही जाळी वाकवून खालून वराह घुसतात. काही वराहांचा मुक्काम तर उसाच्या शेतातच असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी करावे तरी काय?हा प्रश्न पडला आहे. पिंपरी येथील शेतकरी रघुनाथ अर्जुन पाटील यांचे म्हसावद गावालगत चार एकर क्षेत्रात उसाची लागवड केलेली असून शेताला काटेरी तारेचे कुंपणही केलेले असूनही मोकाट गुरांनी चक्क दीड एकर ऊस फस्त केला आहे. शिल्लक उसाची ऊंची एक फुटावर तर खाऊन नुकसान केलेला ऊस जमीनदोस्त झालेला आहे. टवळाई रस्त्यालगत असलेल्या म्हसावद येथील नगीन छगन चौधरी यांचा एक एकर क्षेत्रातील ऊस फस्त केला आहे. दुसरीकडे गावालगत रिकाम्या गुरांच्या झुंडीच्या झुंडी गहू, हरभरा पेरणी केलेल्या शेतांमध्ये घुसून नुकसान करीत आहेत. पिकांचे खाऊन नुकसानीपेक्षा पिके पायदळी जास्त तुडवले जात असल्याने जास्त नुकसान होत आहे. रिकाम्या गुरांना पकडणे म्हणजे तारेवरची कसरत असून, पकडण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येतात. यात काही दुभती जनावरेही आहेत. पशुपालक सकाळ-संध्याकाळ दूध काढून घेतात, चारा मात्र टाकत नाही. बेवारस गुरांप्रमाणे सोडून मोकळे होतात. रिकामी गुरे रात्रभर शेतात, तर दिवसा गावात त्रास देत आहेत. रिकामी गुरे पकडून गोशाळेत पाठवावीत, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व ग्रामस्थांनी बोलून दाखवली. अनेकवेळा ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांच्याकडे कळवूनही काही कार्यवाही केली जात नसल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे. रिकामी गुरे पकडून कोंडण्यासाठी ग्रामपंचायतीचा कोंडवाडा आहे. मात्र त्यात चार-पाच वर्षांपासून एकही गुरेढोरे कोंडली गेलेली नाहीत. कोणीही गुरे पकडून आणत नाही. गुरे कोणी पकडली? का पकडली? नुकसान दाखव? यावरून वाद होतात यासाठी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन ग्रामस्थांची समस्या सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.