शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
3
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
4
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
5
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
6
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
7
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
8
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
9
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
10
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
11
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य
12
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
13
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
14
विशेष लेख: तहव्वुर राणाला आणले, मेहुल चोक्सीचे काय? प्रत्यार्पणाचा इतिहास
15
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
16
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
17
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
18
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
19
नियमांचे उल्लंघन कराल, तर वाळू डेपो होणार रद्द; महसूल मंत्र्यांचा इशारा

साडेतीन एकरातील केळी पिकाची वाढ खुंटल्यामुळे फिरविला नांगर

By मनोज शेलार | Updated: May 26, 2024 19:36 IST

वाण्याविहीर गावालगत मोठ्या प्रमाणावर बागायत शेती केली जाते.

नंदुरबार : अवकाळी, गारपिटीसह विविध अस्मानी-सुलतानी संकटांचा सामना करत केळीचे पीक वाढविले, त्यावर लाखोंचा खर्च केला तो भरघोस उत्पन्न मिळणार या आशेने, परंतु गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानाच्या पाऱ्याने केळी उत्पादक शेतकऱ्याच्या आशा पुरत्या मावळतीला आल्या. काही केल्या केळीची वाढच होत नसल्याने हतबल झालेल्या अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील कन्हैयालाल परदेशी या शेतकऱ्याने तब्बल साडेतीन एकरातील केळी पिकावर नांगर फिरविला आहे.

वाण्याविहीर गावालगत मोठ्या प्रमाणावर बागायत शेती केली जाते. मात्र, दिवसेंदिवस तापमानात होत असलेल्या कमालीच्या वाढीमुळे केळी या बागायती पिकांना भरपूर पाण्याची गरज असल्याने पुरेसे पाणी देऊनही पिकांची वाढ खुंटते व पिके जळू लागली आहेत. तसेच, योग्य प्रकारे उत्पन्न निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 

मे महिन्यात साधारणतः रोजचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. परिसरात जमिनीचा पोत अतिशय उत्तम व काळी कसदार गाळाची जमीन असूनदेखील वाढत्या तापमानाचा फटका या नगदी पिकांना बसू लागला आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकरी उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, निसर्ग साथ देत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे.

वाण्याविहीर येथील कन्हैयालाल परदेशी यांनी गावालगत असलेल्या साडेतीन एकरातील केळी पिकाची वाढ वाढत्या तापमानामुळे होत नसल्यामुळे चार महिन्यांच्या केळी बागेवर नांगर फिरविला, तसेच नवीन पीक घेण्यासाठी शेत तयार करून घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याच शेतकऱ्याची तीन ते चार एकर केळीची बाग तेरा महिन्यांची झाली असून, वाढलेल्या तापमानामुळे केळी योग्य प्रकारे तयार झाली नसल्याने मातीमोल भावात विकली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

टॅग्स :nandurbar-pcनंदुरबारFarmerशेतकरी