शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

संडे स्पेशल मुलाखत- निवडणूक प्रक्रिया यंदा ‘हायटेक’मुळे सुटसुटीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 12:57 PM

ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुटसूटीत होण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात हेल्पडेस्क स्थापन केला आहे. त्यात इच्छूकांना ॲानलाईन सर्व माहिती मिळणार आहे. -बालाजी क्षीरसागर.

मनोज शेलारलोकमत न्यूज नेटवर्कयंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून निवडणूक विभागाने अनेक बदल केले आहेत. त्यात ऑनलाईन प्रक्रिया हा मुख्य बदल आहे. याशिवाय सदस्य म्हणून उभे राहण्यासाठी किमान सातवी पास असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायींमध्ये पारदर्शक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक शाखा सज्ज आहे. बदलेल्या स्वरूपाविषयी सर्व आवश्यक घटकांना प्रशिक्षण देखील यापूर्वीच दिले गेले असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

यंदाच्या निवडणुकीत काय मुख्य बदल झाले आहेत?एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्यात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यामुळे शासन आणि निवडणूक विभागाने अनेक बदल केले आहेत. त्यात मुख्य बदल हा थेट जनतेतून सरपंच निवडण्याऐवजी सदस्यांमधून सरपंच निवड होणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण हे निवडणूकपूर्व काढले जात होते. ते आता निवडणुकीनंतर काढले जाणार आहे. सदस्य पदासाठी किमान सातवी पास ही अट नव्याने टाकण्यात आली आहे. ॲानलाईन सॅाफ्टवेअर प्रणालीतच संपुर्ण निवडणूक कामकाज होणार आहे. याशिवाय प्रत्येक तहसील कार्यालया इच्छुकांसाठी ‘हेल्पडेस्क’ निर्माण करण्यात आलेला आहे.अधिकारी, कर्मचाऱ्यांना नवीन प्रणालीच प्रशिक्षण दिले आहे का?जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार सर्व तहसीलदार, निवडणूक निर्णय अधिकारी व संबधीत कर्मचारी यांना नवीन ॲानलाईन सॅाफ्टवेअर प्रणालीचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्याचे बारीकसारीक तपशील सांगण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेदरम्यान फारशा अडचणी येतील असे वाटत नाही. या सर्व बाबींसाठी नागरिकांचे व राजकीय पक्षांचेही सहकार्य अपेक्षीत आहेच.

हेल्प डेस्कची स्थापना... ॲानलाईन प्रक्रियेसंदर्भात इच्छूक उमेदवारांना अडचणी येऊ नयेत यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात हेल्पडेस्क स्थापन करण्यात आला आहे. तेथे जाऊन शंका निरसन करता येणार आहे. आधी अर्ज आणि आवश्यक घोषणापत्र, दाखले ॲानलाईन अपलोड करावे लागतील. त्यानंतर त्यांची प्रिंट काढून ते जमा करावे लागणार आहेत. त्यासाठी ३० डिसेंबरची मुदत आहे. सातवी पासची अट... सातवी पासची अट नव्याने टाकण्यात आली आहे. १९९५ नंतर जन्मलेल्यांसाठी ती असूनया निर्णयाची माहिती सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी सुचना केल्या आहेत.निष्पक्ष वातावरणात निवडणुका... ग्रामपंचायत निवडणुका खुल्या वातावरणात पार पडाव्या यासाठीचे नियोजन झाले आहे. आचारसंहितेचेही काटेकोर पालन केले जात आहे. यासाठी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना सुचना दिलेल्या आहेत.