शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
3
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
4
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
5
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
6
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
7
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
8
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
9
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
10
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
11
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
12
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
13
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
14
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
15
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
16
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
17
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
18
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
19
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
20
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 

हतनूरचे पाणी प्रकाशात पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 1:05 PM

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : हतनूर धरणातून १५ जुलै रोजी रात्री पाणी सोडल्याने हे पाणी गुरुवारी दुपारी तीन वाजता ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : हतनूर धरणातून १५ जुलै रोजी रात्री पाणी सोडल्याने हे पाणी गुरुवारी दुपारी तीन वाजता प्रकाशा बॅरेजमध्ये पोहोचले. मात्र प्रकाशा बॅरेजने आधीच पाणीसाठा कमी केल्यामुळे या पाण्याच्या धोका टळला असून येणारे पाणी सर्व वाहून जात आहे.सविस्तर वृत्त असे की, १५ जुलै रोजी रात्री हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. हे पाणी गुरुवारी सुलवाडे, सारंखेडा व प्रकाशा येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता पोहोचण्यास सुरुवात झाली. हे पाणी मुबलक प्रमाणात येत आहे. म्हणून प्रकाशा बॅरेजने आठ गेट पूर्ण तर सहा गेट एक मीटरने उघडले आहेत. त्यामुळे येणारे सर्वच पाणी जसेच्या तसे पुढे वाहून जात आहे, अशी माहिती सहायक अभियंता वरूण जाधव यांनी दिली. यापूर्वीच महसूल विभाग, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. यामध्ये नदीकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा संदेश दिला होता. तसेच जनावरे गुरे यांना नदीकाठावर घेऊन जाऊ नये, अशी सूचना दिली होती. त्यामुळे गुरुवारी येथील तापी नदीकाठावर शांतता दिसून आली. प्रकाशा बॅरेज प्रशासनाने आधीच सतर्क राहून दोन दिवस आधी पाच गेट उघडल्याने शिल्लक पाणीसाठा आधीच वाहून गेला. त्यामुळे येणाºया पाण्यावर नियंत्रण झाले आहे. हे पाणी पुढे पाठविल्यामुळे धोका टाळला आहे. आताच्या स्थितीला सुलवाडे बॅरेजचे आठ गेट दोन मीटरने उघडले आहेत. सारंगखेडा बॅरेजचेही १० गेट पूर्ण उघडले आहेत. म्हणून प्रकाशा बॅरेजनेही आठ गेट पूर्ण तर सहा गेट एक मीटरने उघडले आहेत. त्यामुळे आलेला पाणीसाठा आता धोक्याचा राहिला नाही, अशी माहिती अभियंता जाधव व सी.आर. यादव यांनी दिली.