शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

सामाजिक जाणिवेतून ग्रामज्ञान केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 1:07 PM

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. यातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक मोठा फटका ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. यातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. प्राथमिक व माध्यामिक वर्गात जाणा-या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवण्याची भिती असल्याने याठिकाणी आता   गावो गावचे शिक्षित विद्यार्थी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातून सोन बुद्रुक ता. धडगाव येथे ग्रामज्ञान केंद्र सुरु करण्यात आले  आहे. सोन बुद्रूक या गावात सुशिक्षित युवकांनी एकत्र येऊन विद्यार्थांसाठी वर्ग चालू करण्याचे ठरवले आणि हे प्रत्यक्षात देखील उतरवलं. त्यास ग्रामज्ञान केंद्र असे नांव दिलं आणि  पहिली ते पदवीपर्यंतचे वर्ग सुरू केले. गेल्या १ जूलैपासून ते अद्यापपर्यंत या ग्रामज्ञान केंद्रांत गावातील  पहिली ते पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. गावातील तरुणाईने एकत्र येत हा उपक्रम सुरु केला आहे. आपल्या भाऊ-बहिणीचे  कोरोनामुळे बंद असलेल्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांवर त्याचा विपरित परिणाम होऊ नये तसेच सुरू असलेल्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी गावातील ग्रामज्ञान केंद्राने खूप प्रयत्न केल्याचे येथील युवकांकडून सांगण्यात आले.  त्यांच्या या  प्रयत्नाला चांगले यश ही मिळाले. त्यास केंद्रातून गावातील ९० विध्यार्थी वेगवेगळ्या वर्गातून शिक्षण घेत असल्याचे चित्र सध्या याठिकाणी दिसून येत आहे. शाळेतील होणाऱ्या विविध स्पर्धांचा कमीपणा मुलांना वाटू नये म्हणूनच या तरुणाईने विविध  महापुरुषाची जयंती, पुण्यतिथीसह सामाजिक कार्य या सर्व बाबींवर उत्साहात कार्यक्रम पार पाडले. हे सर्व यशस्वी करण्यासाठी या तरुणाईला गावातील नोकरवर्ग  सर्व गावकरी, पालकवर्ग, युवक, पोलीस पाटील, तसेच ग्रामपंचायत प्रशासन सहाकार्य करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ग्रामज्ञान केंद्र सोन बुद्रूकचे कार्य बघून शहादा येथील सामाजिक संस्था विचारधारा फाउंडेशनचे अध्यक्ष तात्या पवार यांनीही याठिकाणी भेट देत मदत करण्याची हमी दिली आहे. यावेळी त्यांच्याहस्ते केंद्रात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण साहित्यांचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील  सामाजिक संघटना आदिवासी टायगर सेना धडगाव यांनी देखील मुलांना शैक्षणिक साहित्य या सर्व ९० विद्यार्थिनींना वाटप केली.ग्रामज्ञान केंद्रांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून या तरुणाईने  कोणत्याही प्रकारची शिकवणी फी आकारली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.  गावातील शिक्षित युवकांनी केवळ सामाजिक जाणीव ठेवत हे केंद्र सुरु केल्याची माहिती युवकांकडून देण्यात आली.  विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन व तासिका देत त्यानुसार येथे कामकाज सुरु आहे. एक युवक एक विषयावर अभ्यास घेत विद्यार्थ्यांकडून अभ्यास करवून घेत असल्याची माहिती देण्यात आले आहे. गावातील युवकांनी केलेल्या उपक्रमाचे काैतूक होत असून दुर्गम भागातील इतर शिक्षित युवक या प्रकारचे उपक्रम गावोगावी सुरु करत असल्याची माहिती देण्यात आली  आहे. 

३० विद्यार्थ्यांचा एक गट तयारया विद्यार्थ्याना शिकविण्यासाठी गावातील सुशिक्षित  १२ जणांचा ग्रुपदेखील आहे. या ग्रुपमधील तरुण वर्ग कोरोना महामारीच्या कठिण  काळात विद्यार्थ्यांना  शिकवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून प्रत्येक वर्गाचा अभ्यास क्रमानुसार वेळापत्रक तयार करून ३० विद्यार्थ्याचा गट तयार करून  तीन शिप्ट मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. ग्रामज्ञान केंद्रामध्ये शालेय शिक्षणासोबतच आदिवासी संस्कृतीचे धडेदेखील दिले जात होते. जेणेकरून येणाऱ्या पिढीने आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करावे हा उद्देश होता.