शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
3
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
4
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
5
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
6
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
7
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
8
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
9
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
10
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
11
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
12
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
13
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
14
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
15
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
16
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
17
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
19
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
20
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार

अमृत आहार गैरप्रकार :सर्व संबधीत घटकांवर जबाबदारी निश्चित करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 12:23 PM

अमृत आहारमधील गैरप्रकार प्राथमिक स्तरावर महिला व बालविकास विभागानेही मान्य केल्यानेच आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीचे आदेश दिले आहेत. ती चौकशी झालीच पाहिजे. -लतिका राजपूत

संडे स्पेशल मुलाखत

मनोज शेलारलोकमत न्यूज नेटवर्कलॅाकडाऊनमध्ये जनतेला गावोगावी रेशनचे मोफत धान्य पोहचू शकते तर अंगणवाडी सेविकांना अमृत आहारचा पुरवठा का होऊ शकत नाही. जिल्ह्यातील ठेकेदार तयार असतांना थेट पुण्याचा ठेकेदार नेमण्याची गरज काय? आहार पुरवठ्यात झालेल्या दिरंगाईची आणि गैरप्रकाराची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी व कुणा एकावर नव्हे तर त्यातील संबधीत सर्व घटकांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी आमची आजही मागणी कायम असल्याचे हा गैरप्रकार उघड करणारे व नर्मदा आंदोलनाच्या कार्यकर्त्या तसेच जिल्हा व राज्य गाभा समितीच्या अशासकीय सदस्या लतिका राजपूत यांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले. 

योजनेतील गैरप्रकार आपल्या कशा लक्षात आला?लॅाकडाऊनच्या काळात अर्थात एप्रिल व मे महिन्यात अमृत आहार मिळतो का? म्हणून सहज चौकशी केली, तर अनेक ठिकाणी तो उपलब्ध झाला नसल्याचे दिसून आले. २१ मे रोजी गाभा समितीच्या राज्य बैठकीत हा मुद्दा मांडला. तेथे वाटप सुरू असल्याचा दावा करण्यात आला. पुन्हा तपासणी केली परंतु तोच प्रकार दिसून आला. त्यानंतर जून महिन्यात ब्लाॉक लेव्हलचा बैठका झाल्या त्यावेळी वाटपाचे नियोजन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर माल कुठून येतो आहे विचारणा केली तर खालून वरपर्यंत सर्वांचे एकच उत्तर वरून येत आहे एवढेच होते. त्यानंतर खोलात जाऊन तपास केला असता पुणे येथील ठेकेदार असल्याचे स्पष्ट झाले आणि गौडबंगाल समोर आले. मिडियानेही यासंदर्भात वृत्त प्रकाशीत केले. २४५ अंगणवाडीव्यतिरिक्त इतर कुठल्याही अंगणवाडीत आहार पुरवठा झाला नव्हता हे सिद्ध झाले आहे. आता त्यातील गैरप्रकार बाहेर निघावे हीच आमची मागणी आहे. 

दोन्ही समितींकडून मवाळपणा का? जिल्हास्तरीय चौकशी समिती नेमली त्यात जिल्हा परिषदेचे अधिकारी नेमले गेले. जिल्हा परिषदेचा गैरप्रकार जिल्हा परिषदेचे अधिकार करणार तर तो चौकशी अहवाल कसा राहील हे स्पष्टच आहे आणि झालेही तसेच. नंतर नेमलेल्या समितीनेही दुर्गम भागातील अंगणवाडींमध्ये चौकशी न करता सपाटीवरील भागातील अंगणवाडीची चौकशी करून अहवाल सादर केला. आता राज्य स्तरावरूनच आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार असल्याने सर्व काही स्पष्ट होईल.पुढची भुमिका काय?या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहेच, परंतु दोन महिने आहार पोहचला नाही. लाभार्थी लाभापासून वंचीत राहिले. या सर्वांची आता निपक्षपातीपणे चौकशी होईल तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा सुरूच ठेवणार आहोत.