शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

खान्देशातील सहा कारखान्यांनी केले २२ लाख टन उसाचे गाळप

By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: May 06, 2023 7:34 PM

यंदा खान्देशातील सहा कारखान्यांनी गाळप केले असून त्यांनी २२ लाख टन ऊस गाळप केला आहे.

नंदुरबार : राज्यातील साखर हंगामाची सांगता झाली असून यावर्षी राज्यातील २१० साखर कारखान्यांनी १० कोटी ५२ लाख ८८ हजार टन उसाचे गाळप केले आहे. दरम्यान, यंदा खान्देशातील सहा कारखान्यांनी गाळप केले असून त्यांनी २२ लाख टन ऊस गाळप केला आहे.

राज्यातील साखर हंगाम यंदा सरासरी १२१ दिवस चालला. गेल्यावर्षी हाच हंगाम १७३ दिवस सुरू होता. गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी गाळप झाले असून यंदा १०६ सहकारी व १०४ खाजगी अशा २१० कारखान्यांनी १० कोटी ५२ लाख ८८ हजार टन उसाचे गाळप करुन १० कोटी ५३ लाख १७ हजार क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत तीन कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन कमी आहे.

खान्देशातील सहा कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम घेतला. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा, आयान व आदिवासी या तीन साखर कारखान्यांनी १४ लाख २८ हजार ६३ टन ऊस गाळप केला आणि १४ लाख ८३ हजार ३०४ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर जळगाव जिल्ह्यातील बेलगंगा, चोपडा व संत मुक्ताई साखर कारखान्यांनी आठ लाख एक हजार १८० टन उसाचे गाळप करुन सात लाख ८९ हजार ३३७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सरासरी उतारा १०.३९ आहे. तर जळगाव जिल्ह्याचा सरासरी उतारा ९.८५ आहे.

सर्वाधिक गाळप आयानचेराज्यातील २१० पैकी १० लाखापेक्षा अधिक टन उसाचे गाळप करणारे १९ कारखाने असून त्यात १३ वा क्रमांक नंदुरबार जिल्ह्यातील आयान शुगरचा आहे. या कारखान्याने १० लाख ६१ हजार २७२ टन उसाचे गाळप करुन १०.५० च्या सरासरी उताऱ्याने ११ लाख १४ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने