शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
मराठा तितुका मेळवावा नाही, ओबीसी संपावावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
4
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
5
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
6
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
7
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
8
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
9
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
10
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
11
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
12
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
13
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
14
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
15
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
16
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
17
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
18
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
19
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
20
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा

उत्तर महाराष्ट्रातील अत्याधुनिक लॅब नंदुरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:03 PM

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून अजून विविध उपाययोजनांचे नियोजन केले असून ते प्रमाण शुन्यावर आणण्याचे नियोजन आहे. - डॉ.राजेंद्र भारूड

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कमध्यप्रदेश आणि गुजरातच्या सिमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सुरुवातीपासूनच जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे नियोजन केले होते. त्याचा निश्चित परिणाम दिसत असला तरी अजूनही वाढते रुग्ण चिंताजनक असून ते प्रमाण कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. खास करून जिल्ह्यात आतापर्यंत तपासणी प्रयोगशाळा नव्हती, सध्या सुरू झाली असली तरी त्याची क्षमता कमी असून अजूनही धुळे व इतर तपासणी लॅबवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे नवीन आधुनिक तपासणी प्रयोगशाळा जिल्ह्यात लवकरच सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.सध्या कोरोना रुग्ण व मृत्यूचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत असल्याने त्यावर काय उपायोजना होत आहे.?नंदुरबार जिल्ह्यात इतर भागाच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी असली तरी हे प्रमाण अजून कमी करून ते शुन्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारचे सुक्ष्म नियोजन केले आहे. त्यासाठी खाजगी डॉक्टरांचे स्वतंत्र पथक तयार केले आहे. जिल्ह्याकडे केवळ ३० आॅक्सीजन बेड आहेत. त्याची संख्या वाढवून ती ७५ पर्यंत होणार आहे. याशिवाय साखळी तोडण्यासाठी सर्व पातळीवर प्रयोग सुरू असून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे यासह सर्व नियम पाळून खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.जिल्ह्यात नंदुरबार पाठोपाठ शहाद्यात रुग्ण वाढत आहेत, तेथे काय नियोजन?नंदुरबारनंतर शहाद्यात रुग्ण अधीक आहेत. त्यामुळे शहादा येथे देखील स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्याचे प्रयत्न असून लवकरच ते सुरू होईल. कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर तेथे उपचार होतील. याशिवाय शहाद्यात क्वॉरंटाईन सेंटरही वाढविले असून रुग्णांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली आहे.

नंदुरबार येथे अत्याधुनिक प्रयोगशाळेला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी एक कोटी ६५ लाख रुपये खर्चालाही मंजुरी मिळाली असून मशिनरीची आॅडर्र नोंदविली आहे. सिंगापूरहून ही मशिनरी येत आहे. ही लॅब साधारणत: १२०० स्वॅब तपासणी क्षमतेची असून उत्तर महाराष्टÑातील सर्वात मोठी व आधुनिक लॅब ठरणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत सुविधा पोहचविण्याचा प्रशासनाने प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यामुळे रेशनचे वितरण चांगले झाले. नवीन किमान ३६ हजार लोकांना रेशन मिळाले व त्यासाठी १२ हजार नवीन रेशनकार्डही दिले. रोहयोच्या कामांवर जास्ततीत जास्त मजुरांना काम देण्याचा प्रयत्न झाला. ६५ हजारापेक्षा अधीक मजूर या योजनेच्या प्रवाहात आले. दुर्गम, अतिदुर्गम भागातील जनतेच्या प्रश्नांची दखल घेऊन उपाययोजना केल्याने त्याची चांगले परिणाम दिसून आले आहेत.