शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सातपुड्याच्या दुर्गम भागात मोलगी-वडफळी रस्त्यावरच्या पुलाला दोन महिन्यातच तडा

By भूषण.विजय.रामराजे | Updated: July 12, 2023 18:42 IST

अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी ते वडफळीदरम्यान बोती गावाजवळील पुलाला तडे गेले आहेत.

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी ते वडफळीदरम्यान बोती गावाजवळील पुलाला तडे गेले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. तडा गेल्याने सुरू असलेल्या पावसात पूल वाहून जाण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे.गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडण्यासाठी मोलगी ते वडफळी हा रस्ता तयार करण्यात आला होता. प्रथम राज्य मार्ग क्रमांक तीन अशी त्याची बांधकाम विभागाकडे नोंद आहे.

सातपुड्यातील नागरिकांना गुजरात राज्यातील मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर गणला जातो. मार्गावरून मोठी वाहतूक होत असल्याने रस्त्याचा विकास गेल्या काही वर्षात करण्यात आला आहे. या अंतर्गत पिंपळखुटा ते मोकसदरम्यान पुलाचे बांधकाम दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले आहे. परंतु सुरू असलेल्या पावसात या पुलाला तडा जाऊन भिंत कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे प्रशासनाने तातडीने पुलाच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे.वडफळी भागातील नागरिकांना मोलगी येथे येण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. पावसात रस्ता वाहून गेल्यास अतिदुर्गम भागातील वडफळी गावाचा संपर्क नंदुरबार जिल्हा आणि महाराष्ट्रासोबत तुटणार आहे. यामुळे प्रशासनाने पुलाची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.