शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

जिल्ह्यात ‘तुटी’चा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:05 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा जिल्ह्यात सरासरी इतका पावसाचा अंदाज वर्तविला असतांनाही जुुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ ३० टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदा जिल्ह्यात सरासरी इतका पावसाचा अंदाज वर्तविला असतांनाही जुुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ ३० टक्के पाऊस झाला आहे. सरासरी २६ टक्के पाऊस कमी झाला आहे. आतापर्यंत झालेला पाऊस देखील सर्वत्र सारखाच झालेला नाही. त्यामुळे लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणी साठ्यात देखील अपेक्षीत वाढ झालेली नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, येत्या काळात समाधानकारक पावसाची शक्यता वर्तविली जात असल्याने अपेक्षा लागून आहेत.जिल्ह्यात यंदा वेळेवर पावसाला सुरुवात झाली. परंतु सर्वच भागात पावसाचे प्रमाण सारखे राहिले नाही. त्यामुळे पेरण्या देखील पुर्ण क्षेत्रात झालेल्या नाहीत. लघु व मध्यम प्रकल्पांमध्येही पाणी साठा होऊ शकला नाही. सरासरी केवळ २९.९ टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस धडगाव तालुक्यात ४१ तर सर्वात कमी अक्कलकुवा तालुक्यात २० टक्के पाऊस झाला आहे.जुलैपर्यंतचा अंदाज चुकलाजुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरीचा निम्मे पाऊस होणार असल्याचा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला होता. परंतु तो फोल ठरला. तब्बल २६ टक्के पावसाची तूट राहिली आहे. ही तूट येत्या काळात भरून निघणार किंवा कसे याकडे आता लक्ष लागून आहे. सुदैवाची बाब म्हणजे हवामान खात्याने येत्या काळात समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे ही तूट भरून निघण्याची अपेक्षा लागून आहे.पेरणीही अपुर्णजिल्ह्यातील एकुण व लक्षांक असलेल्या क्षेत्रावर देखील खरीप पेरण्या होऊ शकल्या नसल्याची स्थिती आहे. आतापर्यंत केवळ ७६ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. येत्या काळात अर्थात जुलै अखेर उर्वरित क्षेत्रात पेरण्या पुर्ण होण्याची शक्यता आहे. अर्थात येत्या काळात पावसाची स्थिती कशी राहील यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. गेल्या वर्षी जुलैच्या मध्यापर्यंत पुर्ण क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या.प्रकल्पांमध्ये २५ टक्के साठाजिल्ह्यातील ३६ लघु व सहा मध्यम प्रकल्पांमधील पाणी साठ्यात फारशी वाढ झाली नाही. गेल्या वर्षी झालेल्या सरासरीपेक्षा अधीक पावसामुळे सर्व लघु व मध्यम प्रकल्प तुडूंब भरले होते. उन्हाळ्यात देखील एकही प्रकल्प कोरडा झाला नव्हता. गेल्या वर्षाचा पाणी साठा अद्यापही अनेक प्रकल्पांमध्ये कायम आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नव्याने पाणीसाठा वाढला नसल्याची स्थिती आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी २५ टक्के पाणीसाठा आहे.नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाºया विरचक प्रकल्पात मात्र समाधानकारक अर्थात ४० टक्केपर्यंत पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात या प्रकल्पात नव्याने पाणीसाठा झाला नसल्याचे चित्र आहे. याशिवाय सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या दरा, राणीपूर, धनपूर यासह इतर प्रकल्पांमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाला आहे. सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघड्यात आल्याने पाणीसाठा कमी झाला आहे. आता जुलै अखेर सर्व पाणी सोडून दिले जाणार आहे.यापुढेही पावसाने ताण दिला किंवा सरासरीपेक्षा कमी झाला तर यंदा पावसाची तूट मोठ्या प्रमाणावर राहण्याची शक्यता आहे. परंतु हवामान विभाग आणि खाजगी संस्थाच्या अंदाजानुसार आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा सरासरीइतका अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.