शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
2
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
3
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
4
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
5
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
6
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
7
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
8
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
9
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?
10
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
11
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
12
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
13
सुवर्णसंधी! ONGC मध्ये 2 हजारांहून अधिक अप्रेंटिस भरती, स्टायपेंड किती मिळणार? पाहा...
14
Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक
15
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते
16
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
17
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
18
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
19
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
20
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये बिनविरोधला फाटा, सर्वच ठिकाणी निवडणूक रंगण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 12:21 PM

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायत वगळता एकही ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होऊ शकत नसल्याची स्थिती आहे. आता ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायत वगळता एकही ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होऊ शकत नसल्याची स्थिती आहे. आता देखील ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणुकीची चुरस वाढली आहे. कोरोना, लॅाकडाऊन, अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेेले आर्थिक संकट यामुळे निवडणुका बिनविरोध कराव्या यासाठी चर्चा असली तरी निवडणुका अटळ असल्याचे चित्र आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकुण ५९५ ग्रामपंचायती आहेत. या पैकी मुदत संपलेल्या व संपणारऱ्या अशा ८७ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर होऊन प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदाचे वर्ष हे विविध संकटांचे होते. कोरोनाने तर अनेकांचे होत्याचे नव्हते केले. शेतमालाला भाव नाही, अतिवृष्टीने पीके हातची गेली. त्यामुळे गाव पातळीवर आर्थिक संकटाचे वातावरण आहे. परिणामी निवडणूका टाळून सामंजस्याने गावची निवडणूक बिनविरोध करावी अशी अपेक्षा अनेक ठिकाणी आहे. परंतु गाव गाड्याचे राजकारण पहाता, राजकीय पक्षांना आपली दुकानदारी टिकविण्यासाठी आणि आपल्याच गटाच्या, पक्षाच्या ताब्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायती राहाव्या यासाठी निवडणुका लढविल्या जात आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडणूक एकाही गावाची होणार नाही हे अगदीच स्पष्ट आहे. नंदुरबार जिल्ह्यात कॅांग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या पक्षांनी  व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. ठिकठिकाणी बैठका घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. एकुणच वर्षभरापासून जिल्ह्यात एकही सार्वत्रिक निवडणूक झाली नसल्याने आता ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून असून यावेळी एकही ग्रामपंचायत बिनविरोध होणार नाही हे जवळपास स्पष्टच आहे. 

बिनविरोधची परंपरा असलेले पुरुषोत्तमनगर एकमेव गाव जिल्ह्यात पुरुषोत्तमनगर ही एकमेव ग्रामपंचायत बनविरोध निवडणूक होणारी आहे. या ठिकाणी सर्वच महिला सदस्यांना निवडून दिले जाते. सरपंच देखील महिलाच असते. त्यामुळे महिला राज असलेली, बिनविरोध होण्याची परंपरा असलेली ही खान्देशातील एकमेव ग्रामपंचायत असल्याचेही चित्र आहे. या टप्प्यात ग्रामपंचायतीची निवडणूक नाही. 

राजकीय पक्षांना मिळाले बळजिल्ह्यात वर्षभरापूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक झाली होती. त्यानंतर एकही निवडणूक झाली नाही. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. तब्बल वर्षभर एकही सार्वत्रीक निवडणूक नसल्यामुळे राजकीय पक्षांमध्येही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही मरगळ होती. आता ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही उभारी येणार आहे. या माध्यमातून राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.