शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
2
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
3
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
4
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
5
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
6
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
7
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
8
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
9
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
10
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
11
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
12
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
13
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
14
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
15
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
16
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
17
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
18
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
19
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
20
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

पंचवटीसह २० रेल्वेगाड्या १० मेपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:15 AM

नाशिकरोड : प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने पंचवटी, जनशताब्दी, अमरावती-मुंबई यासह वीस प्रवासी रेल्वेगाड्या प्रशासनाने २७ एप्रिलपासून १० ...

नाशिकरोड : प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने पंचवटी, जनशताब्दी, अमरावती-मुंबई यासह वीस प्रवासी रेल्वेगाड्या प्रशासनाने २७ एप्रिलपासून १० मेपर्यंत रद्द केल्या आहेत.

पंचवटीने दररोज मुंबई, ठाण्याला कामानिमित्त व व्यवसायानिमित्त दररोज नाशिकहून शेकडो जण जातात. परंतु राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवेची आस्थापनावगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयातदेखील उपस्थितीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे पंचवटी एक्स्प्रेसची गर्दी कमी झाली आहे. पंचवटीप्रमाणेच राज्याच्या विविध भागात जाणाऱ्या रेल्वेनादेखील गर्दी कमी झाल्याने रेल्वे प्रशासनाने १० मेपर्यंत या रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नंदीग्राम मात्र सुरू राहणार आहे.

नागपूर-पुणे गरीबरथ, नागपूर-मुंबई दुरांतो या गाड्या नाशिकला थांबत नसल्यातरी त्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे-नागपूर, मुंबई-नागपूर, मुंबई-अमरावती, मुंबई-जालना या मुंबईला जाणाऱ्या व परत येणाऱ्या गाड्यांचाही यामध्ये समावेश आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनपासून पंचवटी व अन्य इंटरसिटी ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्पेशल ट्रेनच्या नावाने सुरू झाल्या. तथापी, सुरू झाल्यापासूनच पंचवटीला प्रतिसाद खूप कमी प्रमाणात मिळत होता. स्पेशल ट्रेनमुळे या गाडीचे भाडेही वाढले होते तसेच आरक्षण करावे लागत असल्याने प्रवासी, पासधारक वैतागले आहेत. गाडी येण्याआधी ९० मिनिटे यावे लागते. त्यामुळे प्रवाशांनी कसारा लोकल, खासगी वाहनांनी मुंबई गाठणे पसंत केले आहे. त्यामुळे गाडीचा प्रतिसाद कमी झाला आहे.