शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘त्या’ ठरावांसंदर्भात महापौरांना तीस दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:59 IST

पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणची देखभाल व दुरुस्तीसंदर्भात महासभेने नामंजूर केलेला ठराव आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासनाकडे पाठवून निलंबित केला होता. त्यावर अपील करण्यासाठी महापौरांना तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

नाशिक : पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणची देखभाल व दुरुस्तीसंदर्भात महासभेने नामंजूर केलेला ठराव आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासनाकडे पाठवून निलंबित केला होता. त्यावर अपील करण्यासाठी महापौरांना तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे. याबाबत मनपाच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने नगरसचिव कार्यालयास पत्र सादर केले आहे. मनपा क्षेत्रातील पाणीपुरवठा व्यवस्थेची व्यापक पध्दतीने देखभाल दुरुस्ती करण्याचा विषय गेल्या जुलैमध्ये झालेल्या महासभेत सादर केला होता.   त्याचप्रमाणे मलवाहिकांचा विषयदेखील पाठविला होता. परंतु आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाठविलेले दोन्ही प्रस्ताव नामंजूर करण्यात आले होते. त्यावर आयुक्तांनी सदरचे ठराव महापालिकेच्या हिताचे नसल्याचे आपले मत मांडत दोन्ही ठराव शासनाकडे पाठविले होते. शासनाने १२ आॅक्टोबर रोजी महासभेचा ठराव महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ४५१(१) अन्वये निलंबित करण्याचा आदेश दिला.शासनाच्या या निर्णयाविरुद्ध अभिवेदन (अपील) करावयाचे असल्यास आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांत करण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर हा ठराव पूर्णत: विखंडित होणार आहे.मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील देखभाल व दुरुस्तीची कामे सध्या विभाग तसेच प्रभागनिहाय निविदाप्रक्रि या राबवून करून घेण्यात येतात. त्याअंतर्गत पाइपलाइन व व्हॉल्व, चेंबर्स यांची दुरुस्ती करणे, तसेच पंपिंगस्टेशन व जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत यंत्रांच्या दुरुस्तीची कामे केली जातात. सदरची कामे खासगीकरणाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी सादर केला होता. मात्र महापालिकेने प्रस्ताव नामंजूर केला. त्यावर आयुक्तांनी शासनाकडे नामंजूर ठराव सादर करत विखंडनासाठी प्रस्ताव सादर केला. त्यात बाह्य यंत्रणेद्वारे काम करताना दुरुस्ती वा इतर कामांना बाह्य यंत्रणेमार्फत तत्पर सेवा मिळू शकते, वितरण व्यवस्थापन व देखभाल दुरुस्तीचे व्यवस्थापन करताना बाह्य यंत्रणेद्वारे सेवा उपलब्ध झाल्यास मनपाच्या अभियंता, इतर तांत्रिक व अतांत्रिक कर्मचाऱ्यांना मनपाची भांडवली कामे करता येऊ शकतात. कमी काळात जास्त चांगल्या पद्धतीची सेवा घेऊन नागरिकांना तत्परसेवा देणे शक्य होईल. सहाही विभागात सारख्याच प्रकारचे व्यवस्थापन असल्याने पाणी वितरणात सुसूत्रता येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. ते शासनाला दिलेल्या प्रस्तावात मांडण्यात आले आहे. आता शासनाच्या भूमिकेकडे लक्ष आहे.महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे महापालिकेला नवीन भरतीप्रक्रि या राबविणे शक्य होत नाही. त्यात महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी निवृत्त होत असल्याने मनुष्यबळाची कमतरता आहे. अशा स्थितीत बाह्य यंत्रणेमार्फत पाणीपुरवठा वितरणाची कामे करणे आवश्यक असल्याचे म्हणणे प्रशासनाने पटवून दिल्याने महासभेचे दोन्ही ठराव शासनाने निलंबित केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे