शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

गंगापूर धरणात ३६ टक्के पाणीसाठा

By admin | Published: February 25, 2016 10:09 PM

जलसंकट : एप्रिलमध्ये वितरणात अडथळ्यांची शर्यत

 नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात दि. २२ फेब्रुवारी अखेर ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून घटत चाललेल्या पाणीसाठ्यामुळे एप्रिलमध्ये महापालिकेला पाणी वितरणात अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून विभागवार एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवतानाच ३१ जुलैपर्यंत पाणी पुरविण्यासाठी धरणातून प्रतिदिन सुमारे दोन ते तीन दलघफू पाणी कमी उचलावे लागणार आहे. परिणामी, नाशिककरांना पाण्याची झळ सोसणे क्रमप्राप्त मानले जात आहे. गंगापूर धरणातील जलसाठ्यात घट होत असून उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता बाष्पीभवनाचेही प्रमाण वाढते राहणार असल्याने जलसंकट कायम आहे. गंगापूर धरणात दि. २२ फेब्रुवारी अखेर ३६ टक्के म्हणजे २०१० दलघफू इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच तारखेला धरणात ३७५२ दलघफू म्हणजेच ६७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गंगापूर धरण समुहातील कश्यपी धरणात सद्यस्थितीत ५९० दलघफू म्हणजे ३२ टक्के, तर गौतमी गोदावरीत ७२ दलघफू म्हणजे अवघा ४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. संपूर्ण गंगापूर धरणसमुहात अवघा २९ टक्के पाणीसाठा आहे. तोच मागील वर्षी ६४ टक्के इतका होता. जलसंपत्ती नियामक प्राधिकरणच्या आदेशामुळे गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले त्यावेळी गंगापूर धरणात सुमारे ७३ टक्के पाणीसाठा होता. आता फेब्रुवारी अखेर गंगापूर धरणातील पाणीसाठा निम्म्याहून खाली आला असून शहरावरील जलसंकट आणखी गडद होत चालले आहे. शासनाने दारणा धरणातील ५०० दलघफू पाणी आरक्षित ठेवले असले तरी महापालिकेने आतापर्यंत केवळ २०० दलघफूच्या आसपासच पाणी उचलले असून रोटेशन नसल्याने पाण्याचा उपसा जवळपास थांबविला आहे. त्यामुळे सारा ताण आता गंगापूर धरणावर येऊन पडला आहे. गंगापूर धरणाने आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. धरणातील खडकाळ भाग आता वर डोकावू लागला असून येत्या एप्रिलमध्ये महापालिकेला पाणी उपसा करताना मोठ्या प्रमाणावर अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागण्याची भीती प्रशासकीय सूत्राने वर्तविली आहे.