शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

जिल्ह्यात ४० बालकांनी गमावले आई-वडील !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:14 AM

अनाथ व निराधार झालेल्या बालकांची माहिती गोळा करण्यासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स गठित करण्यात आला असून, त्यासाठी चाईल्डलाईन, महिला ...

अनाथ व निराधार झालेल्या बालकांची माहिती गोळा करण्यासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स गठित करण्यात आला असून, त्यासाठी चाईल्डलाईन, महिला व बाल विकास विभाग, बाल कल्याण समिती, जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच जिल्हास्तरीय कृती दल अशा विविध संस्थांमार्फत हेल्पलाईन सुरू करून अनाथ झालेल्या बालकांची माहिती गोळा केली जात आहे. प्राथमिक पातळीवर गेल्या आठ दिवसात ४० बालकांची माहिती संकलित झाली असून, अशा बालकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. ज्या बालकांना आई-वडील नाहीत व त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यास कोणीही पुढे येणार नाही अशांसाठी शिशुगृह व बालगृहे सुरू करण्यात आले आहेत.

---------------

अगोदर नातेवाईकांना विचारपूस, नंतर घेणार बालकांचा ताबा

* कोरोनामुळे आई किंवा वडील गमावलेल्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारी त्याच्या नजिकच्या आजी-बाबा, काका, मामा यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.

* आई व वडील अशा दोघांना गमावलेल्या बालकांचा ताबा जिल्हा बालकल्याण समिती घेणार. अशा बालकांना शिशुगृह, बालगृहात दाखल करण्यात येणार आहे.

* शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या बालकांचे संगोपन करण्यात येणार आहे. त्यात कोणतीही आर्थिक मदतीची तरतूद नाही.

--------------

४० कोरोनाने आई-बाबा हिरावलेल्यांची संख्या

-------------

अनाथ बालकांचे सरकार करणार काय

१ आई-वडील असे दोघे गमावलेल्या बालकांचे संगोपन करण्यास कोणी नातेवाईक पुढे न आल्यास त्यांचा ताबा सरकार घेणार.

२) आई किंवा वडील यापैकी एकाला गमावलेल्या बालकाचे संगोपन करण्यास नातेवाईक असल्यास अशा बालकाचा शैक्षणिक खर्च सरकार उचलणार.

३) वयाच्या अठरा वर्षापर्यंत अशा निराधार व अनाथ बालकांच्या संगोपनाची जबाबदारी शासनाकडे असणार आहे.

--------------

बाल संगोपनाला प्राधान्य

कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या बालकांचे जिल्हा बाल कल्याण समितीच्या देखरेखीखाली संगोपन व पुनर्वसन करण्यात येणार असून, अशा बालकांची माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे.

- सुरेखा पाटील, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी