शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

४८२ टन कचरा उचलला

By admin | Published: August 06, 2016 12:51 AM

साफसफाई : गाळ काढण्याची मोहीम

नाशिक : गेल्या मंगळवारी (दि. २) झालेल्या अतिवृष्टीसह गोदावरीला आलेल्या महापुरामुळे अनेक भागांत रस्त्यांवर तसेच घरांमध्ये गाळ साचला आहे. सदर गाळ साफ करण्यासह पाणी उपसा करण्याची मोहीम मनपाच्या बांधकाम विभागाने हाती घेतली आहे. दरम्यान, शहरात मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा उचलण्याचेही काम युद्धपातळीवर सुरू असून, सुमारे ४८२ टन कचरा उचलण्यात आल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.महापालिकेच्या बांधकाम विभागाने सहाही विभागात मोहीम सुरू केली आहे. नाशिक पूर्व विभागात चार जेसीबी आणि दहा ट्रॅक्टर, एक स्क्रॅपरच्या मदतीने ७० कामगारांमार्फत २२ ठिकाणी पाणी व गाळ काढण्यात आला, तर ४८ ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले. पश्चिम विभागात पाच जेसीबी व सहा ट्रॅक्टरच्या मदतीने ६० कामगारांमार्फत १५ ठिकाणी गाळ व पाणी काढण्यात आले. तसेच १८६ ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले. पंचवटी विभागात आठ जेसीबी व दोन ट्रॅक्टरच्या मदतीने ५० कामगारांमार्फत १५ ठिकाणी गाळ व पाणी काढण्यात आले. ५८ ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले. नाशिकरोड विभागात दोन जेसीबी व चार ट्रॅक्टरच्या मदतीने ३४ कामगारांमार्फत ५५ ठिकाणी गाळ व पाणी काढण्यात आले. १०४ ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले. सिडकोत ४५ कामगारांच्या माध्यमातून २७ ठिकाणी, तर सातपूर विभागात १५ कामगारांमार्फत तीन ठिकाणी गाळ व पाणी काढण्यात आले. दिवसभरात १३७ ठिकाणी पाणी व गाळ काढण्यात आला, तर ५५१ ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले. दरम्यान, शहरातून ४६५ मे.टन कचरा उचलण्यात आला. त्यासाठी घंटागाडीच्या १९५ फेऱ्या झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. याशिवाय, आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत पूरग्रस्त भागात तसेच पाणी साचलेल्या ठिकाणी औषध फवारणी व जंतूनाशक पावडर टाकण्याचेही काम सुरू आहे.