शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

धक्कादायक! राज्यात रस्ते अपघातात 4 महिन्यांत 5 हजार नागरिकांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:43 PM

पंचवटी : दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालविताना होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखेमार्फत वाहतूक नियमावली ...

पंचवटी : दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालविताना होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखेमार्फत वाहतूक नियमावली तयार केली असली, तरी अनेक वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करीत नसल्याने अपघात घडतात. अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहतूक सुरक्षा सप्ताह जनजागृतीवर भर दिला जातो. मात्र, असे असतानाही राज्यात चालू वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या काळात १९ हजार ३८३ अपघात घडले आहेत. या अपघातात नऊ हजार १२० नागरिक जखमी झाले, तर ५ हजार ३३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात झालेल्या अपघातात एकूण अपघाताचे सर्वाधिक प्रमाण मुंबई शहरात असल्याचे स्पष्ट झाले. तर अपघातात बळी पडणाऱ्यांची सर्वाधिक संख्या नाशिक जिल्ह्यात आहे. सर्वांत कमी अपघात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले असून ५२ अपघातांत १७ नागरिकांनी जीव गमावला आहे. जानेवारी ते एप्रिल चार महिन्यांच्या कालावधीत एकट्या मुंबई शहरात तब्बल ८७६८ अपघात झाले. या अपघातात ५९७ नागरिक जखमी झाले असून १२९ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या वर्षी ८२८ अपघातांत सुमारे ६४७ नागरिक जखमी होऊन १६४ नागरिकांचा जीव गेला होता. गतवर्षी २०२१ मध्ये सर्वांत कमी अपघात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले होते.

२०२२ मध्ये जानेवारी ते एप्रिल महिन्यात झालेल्या एकूण अपघातांत मुंबईचा प्रथम क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे. अपघातात नाशिक ग्रामीण चौथ्या क्रमांकावर असून जीव गेलेल्यांची संख्या नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आहे. चार महिन्यांत बळी जाणाऱ्यांची संख्या ४०७ असून अपघातात नाशिक ग्रामीणमध्ये सर्वाधिक ३४२ आणि नाशिक शहरात ६५ नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी होणाऱ्यांची संख्या मुंबईत सर्वाधिक असून त्याखालोखाल नागपूरचा क्रमांक लागतो. नाशिकचा तिसरा क्रमांक आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत झालेल्या अपघातांत बळी जाणाऱ्यांची सर्वाधिक संख्या नाशिक जिल्ह्याची आहे. त्याखालोखाल पुण्याचा क्रमांक लागतो.

नियमांचे काटेकोर पालन गरजेचे

वाहन चालविताना वाहन चालक अति वेगाने धोकादायक पद्धतीने वाहने चालवितात. त्यावेळी स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालतात आणि त्यातून अपघात घडतात. वाहन चालकांनी हेल्मेट तसेच सीटबेल्टचा वापर करणे, वाहन वेग मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालविले, तर अपघातावर नियंत्रण बसेल.

-प्रदीप शिंदे, (प्रभारी) प्रादेशिक परिवहन अधिकारी

 

टॅग्स :AccidentअपघातMumbaiमुंबईNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र