शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
3
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
4
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
5
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
6
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
7
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
8
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
9
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
10
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
11
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
12
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
13
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
14
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
15
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
16
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
18
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
19
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
20
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

नाशिक जिल्ह्यात 60 टक्क्यांहून अधिक पेरणी ; खासगी कंपन्यांच्या बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 19:35 IST

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली असून, यावर्षी 50 टक्क्यांहून अधिक पेरणी पूणर् पूर्ण झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरणीची कामे खोळंबली होती. परंतु, यावर्षी सुरुवातीलवाच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत जूनमध्ये खरिपाच्या पेरणीत वाढसमाधानकारक पावसाने शेतीच्या कामांना वेग

नाशिक : जिल्ह्यात निसर्ग चक्रिवादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्हयात झालेला मान्सूनपूर्व पाऊस आणि त्यानंतर जूनच्या पहिल्याच पंधरवड्यात  पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतीची कामे वेग मिळाल्याने जिल्ह्यातील बहूतांशी शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या पेरण्यांचे काम पूर्ण केले आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली असून, यावर्षी 50 टक्क्यांहून अधिक पेरणी पूणर् पूर्ण झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरणीची कामे खोळंबली होती. परंतु, यावर्षी सुरुवातीलवाच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.  मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी बियाण्यांची निवड करताना महाबीज  व एनएससी च्या बियाण्यांऐवजी खासगी कंपन्यांच्या बियांण्यांना अधिक पसंती दिली असून यात प्रामुख्याने सोयाबीन, ज्वारी, मका , सारख्या पिकांचा समावेश आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल खासगी कंपन्यांच्या बियाण्यांकडे वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे, आजच्या स्पर्धेच्या युगात शेती क्षेत्रातही विविध कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांची दर्जेदार बियाणे बाजारात आणल्याने अशा बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. शेतकरी बियाणे खरेदी करताना खास करून उगवण क्षमता केंद्रस्थानि ठेवत असला तरी अनेकदा अपुरा ओलाव व वातावरणाती बदल यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावताना दिसते.  यावषी मान्सूनपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील बऱ्याच भागात जोरदार पाऊस पडला त्यानंतर दोन चार दिवसांतच मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली असल्याचे शेती तज्ज्ञांनी म्हटले आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी खरिपात ज्वारी, मका, सोयाबीन या पिकांना पसंती दिली असल्याचे दिसून येत असून, ज्वारीची सर्वसाधारणपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकFarmerशेतकरीRainपाऊसCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ