शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
4
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
7
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
8
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
9
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
10
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
11
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
12
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
13
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
14
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
15
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
16
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
17
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
18
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
19
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
20
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील केटीएचएन महाविद्यालयात अभाविप छात्रभारती आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 17:53 IST

नाशिकमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व छात्रभारतीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचा प्रकार घडला. अभाविपचे कार्यकर्ते महाविद्यालयाच्या आवारात सीएए व एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवित असताना छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी अभाविपवर जमावबंदीचे उल्लंघन करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा आरोप करीत विरोध केल्याने दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली .

ठळक मुद्देनाशिकमध्ये अभिविप व छात्रभारती आमने-सामने सीएए , एनआरसी कायद्यावरून दोन गटात बाचाबाची महाविद्यालय प्रशासनाच्या मध्यस्थीतून परिस्थिती नियंत्रणात

नाशिक : देशभरात सीएए व एनआरसी कायद्यावरून विरोध व समर्थनार्थ आंदोलने आणि सभा सुरू असताना नाशिकमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व छात्रभारतीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचा प्रकार घडला. अभाविपचे कार्यकर्ते महाविद्यालयाच्या आवारात सीएए व एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवित असताना छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी अभाविपवर जमावबंदीचे उल्लंघन करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा आरोप करीत विरोध केल्याने दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात गुरुवारी (दि. २३) अभाविपचे कार्यकर्ते सीएए व एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवित असताना हा प्रकार घडला. देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्यकांना भारतीय नागरिकत्व मिळणार असल्याविषयी अभाविपतर्फे विद्यार्थ्यांना माहिती देऊन सीएए, एनआरसी समर्थनार्थ त्यांच्या स्वाक्षºया घेण्यात येत असताना छात्रभारतीच्या काही कार्यकर्त्यांनी मोहीम थांबविण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आला. तर शहरात जमावबंदी लागू असताना अभाविपने विनापरवानगी महाविद्यालयात घुसून सीएए व एनआरसी समर्थनाचे बॅनर झळकावत विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट समाजविरोधी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये बाचाबाची होऊन अभाविप व छात्रभारतीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने महाविद्यालयाच्या परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, ही गोष्ट महाविद्यालय प्रशासनाच्या लक्षात येताच प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी मध्यस्थी करीत दोन्ही गटांच्या विद्यार्थ्यांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली.  

केंद्र सरकारने सुधारित नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेत जरी पारीत केला असला तरी तो राज्यघटनेच्या मूळ उद्दिष्टांशी विसंगत आहे. भारतीय घटनेच्या १४व्या कलमानुसार जात, लिंग, वंश आणि धर्म या आधारे भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे. या कायद्यामुळे केवळ नागरिकत्वच नव्हे, तर राज्यघटना आणि लोकशाहीची मूल्ये धोक्यात आली आहेत. अभाविप स्वाक्षरी मोहीम राबवत असताना सदर बॅनरवर विशिष्ट धर्माचा उल्लेख केलेला असून, महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जात-धर्माचा प्रचार करणे व विद्यार्थ्यांमध्ये जातीय तेढ निर्माण करणे चुकीचे आहे.- समाधान बागुल, राज्य कार्यकारिणी सदस्य, छात्रभारती विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र 

सीएए, एनआरसी समर्थनार्थ स्वाक्षरी अभियानात विद्यार्थी, प्राध्यापक व महाविद्यालयांच्या कर्मचाºयांनीही  प्रतिसाद दिला. ही स्वाक्षरी मोहीम छात्रभारतीने हाणून पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला. सीएए, एनआरसी कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही. - अथर्व कुलकर्णी, महानगर मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय