शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

ओतूर परिसरात कांदा लागवडीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 5:35 PM

ओतूर : परिसरात अवकाळी रिमझिम पावसामुळे थांबलेली उन्हाळ कांदा लागवडीला चार दिवसांपासून पुन्हा वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे.

यावर्षी परतीच्या पावसाने परिसरात जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी महागडी कांदा बी घेऊन केलेली लागवड पूर्णपणे वाया गेली होती. त्यानंतर पुन्हा पाच हजार रुपये किलो दराने नगर जिल्ह्यातील गावातून बियाणे आणू शेतकऱ्यांनी उळे टाकले होते. त्याचीही उगवण समाधानकारक झाली नाही. अगोदरच रब्बी हंगाम लांबल्याने व रोपांची टंचाई यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. तसेच मागील वर्षाचा शिल्लक कांदा खराब होत असून भाव कमी होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मजूरांची टंचाई सर्वत्र जाणवत असल्याने ठेका पध्दतीने कांदा लागवड केली जात आहे.ओतूर धरणातील पाणी गळतीमुळे दिवसेंदिवस कमी होत असल्याने पाणीटंचाईची समस्या उद‌्भवणार आहे. रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले भाव तसेच सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मर्यादित वेळेत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे लागवड पुरेशी होत नसल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती