शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

उर्दूचे गाढे अभ्यासक आदम मुल्ला यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 16:28 IST

प्रत्येक उर्दू शायरच्या शायरीमधला मतितार्थ, भावार्थ मुल्लाजी चपखलपणे वर्णन करत असे. उर्दूसह अरबी, मराठी, इंग्रजी, फारसी, बंगाली या भाषांवरदेखील त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते.

ठळक मुद्देउर्दूच्या विकासासाठी नेहमीच मुशायरे घेतलेउर्दूसंस्कृती लोकांमध्ये रूजविण्याचे पुरेपुर प्रयत्न केले.नाशिकमध्ये उर्दूला जीवंत ठेवण्याचे काम आदममुल्ला यांनी केले,

नाशिक : मुळचे घोटी येथील रहिवासी मात्र मागील अनेक वर्षांपासून शहरातील सारडासर्कल परिसरात स्थायिक झालेले उर्दूचे गाढे अभ्यासक आणि विविध उर्दू कवींच्या साहित्याची खोली जाणून घेणारे उर्दू भाषेचे सेवक आदम मुल्ला उर्फ बाबा यांचे वयाच्या ८७व्या वर्षी रविवारी (दि.१२) सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच उर्दू साहित्यक्षेत्रात शोककळा व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवाचे दफनविधी करण्यात आले.आदम मुल्ला हे एका व्यावसायिक कुटुंबातील व्यक्तीमत्व. त्यांचे बालपण मुंबईत गेले. सुरूवातीच्या काळात घोटी येथे भातगिरणीचा त्यांनी व्यवसाय चालविला. कालंतराने ते नाशिकमध्ये स्थायिक झाले. शिंगाडा तलाव-मनोहर मार्केट परिसरातील ग्रीन लॉन्स येथे त्यांचे निवासस्थान. नाशिकमध्ये उर्दू भाषेवर प्रेम करणारे खूप लोक आहे, मात्र त्याचे जाणकार कमी असल्याचे आदमजींच्या निदर्शनास आले. त्यांनी आपल्या उर्दूच्या अभ्यासाचा फायदा उर्दू भाषेच्या विकासासाठी करायचे ठरविले. दरम्यानच्या काळात जुने नाशिकमधील फाळकेरोडवरील ज्येष्ठ उर्दू शायर गुलाम जोया, नासीर शकेब, अ‍ॅड.नंदकिशोर भुतडा, राम पाठक यांच्यासारख्या शायरवर्गांशी त्यांचा संपर्कच नव्हे तर मैत्री झाली. जोया, भुतडा कुटुंबियांशी त्यांचे घट्ट ऋणानुबंध जुळले होते. बज्मे यारॉँ या नावाने त्यांनी उर्दू साहित्याला वाव देण्यासाठी संस्थाही स्थापन केली होती. या संस्थेअंतर्गत त्यांनी नेहमीच उर्दूच्या विकासासाठी मुशायरे घेतले. गुलाम जोया हे नेहमी प्रसिध्दीपासून दूर राहिलेले शायर. मिठाईचे दुकान चालविणारे जोया, यांची ओळख मुल्ला यांच्याशी झाली त्यानंतर त्यांनी त्यांच्या रेंगते लम्हे, देर-सवेर हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला.नाशिकमध्ये उर्दूला जीवंत ठेवण्याचे काम आदममुल्ला यांनी केले, असे म्हणणे वावगे ठरू नये. त्यासाठी उर्दूची प्रामाणिक उपासना करत त्यांनी उर्दूची संस्कृती लोकांमध्ये रूजविण्याचे पुरेपुर प्रयत्न केले. उर्दू शायरी मुल्ला यांनी स्वत:हून कधी रचली नाही; मात्र प्रत्येक उर्दू शायरच्या शायरीमधला मतितार्थ, भावार्थ मुल्लाजी चपखलपणे वर्णन करत असे. उर्दूसह अरबी, मराठी, इंग्रजी, फारसी, बंगाली या भाषांवरदेखील त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, बहीणी, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

--आदम बाबा यांच्यासारखी दुसरी व्यक्ती होणे नाही. ऐसा कहां से लाये, के तुझसा कहें उसे...., 

रस्मे उल्फत सिखा गया कोई,दिल की दुनिया बसा गया कोई,वक्त-ए-रूख्सत गले लगा कर, हंसते हंसते रूला गया कोई    -सुनील कडासने,अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

हजारो शेर तोंडपाठ असणारे आदमभाई हे स्वत: एक मैफल (नशिश्त) होते. बिछडा कुछ इस अदा से, कि रूत ही बदल गयी, इक शख्स सारे शहर को वीरान कर गया... - अ‍ॅड. नंदकिशोर भुतडा,उर्दूवर अस्सल प्रेम करणारा व शायरीची कलेची पारख असणारा मित्र गमावला. गलियां उदास-उदास हैं, सुनसान रास्ते...रौनक ही ले गया हैं, वो बस्ती से क्या गया... -नासिर शकेब,ज्येष्ठ शायर 

 

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यूMuslimमुस्लीम