शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आधार जोडा, अन्यथा रेशन नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 19:04 IST

पिंपळगाव बसवंत : रेशन दुकानांतील गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भाव दुकाने बायोमेट्रिक प्रणाली तसेच आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय सरकारकडून तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयाचे कार्ड धारकांकडून स्वागत होत कुटुंब प्रमुखांसह सदस्यांचे देखील आधारकार्डच्या प्रत देण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा रेशन कार्डमधील सदस्यांच्या आधार कार्डचे सत्यापन (पडताळणी) करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे

ठळक मुद्देपुन्हा पडताळणी : कार्ड जमा करण्यासाठी गर्दी

पिंपळगाव बसवंत : रेशन दुकानांतील गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भाव दुकाने बायोमेट्रिक प्रणाली तसेच आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय सरकारकडून तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयाचे कार्ड धारकांकडून स्वागत होत कुटुंब प्रमुखांसह सदस्यांचे देखील आधारकार्डच्या प्रत देण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा रेशन कार्डमधील सदस्यांच्या आधार कार्डचे सत्यापन (पडताळणी) करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहेअन्यथा, रेशन मिळणार नसल्याचे रेशन दुकानदारांनी सांगितल्यावर नागरिक धास्तावले आहे. त्यामुळे रेशन धान्य दुकानांत आधार कार्ड जमा करण्यासाठी कार्ड धारकांची तारांबळ उडाली आहे.रेशनिंग व्यवस्थेतील दोष आणि गैरव्यवहारांबाबत सरकारकडे अनेक तक्रारी येत होत्या. त्यासाठी सरकारने रेशनिंग व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. या माध्यमातून पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूंचे नियमित, विहित वेळेत आणि पारदर्शी पद्धतीने वितरण करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा आधार घेण्यात आला. त्यानुसार, ई-केवायसी करण्यासह बायोमेट्रिक आणि पोर्टेबिलिटी पद्धतीचा अवलंब सुरू झाला. ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण होऊ लागले. शिधावाटप अधिकाऱ्यांद्वारे वेळोवेळी करण्यात आलेल्या आवाहनामुळे शिधापत्रिका धारकांनी आपले व कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, आपली जुनी शिधावाटपपत्रिका, बँकेचे पासबुक तसेच स्वत:चे छायाचित्र घेऊन अर्जदेखील भरून दिले होते. मात्र आता आधार पडताळणीसाठी शिधापत्रिकेवरील सर्वच सदस्यांचे आधार कार्ड रेशन कार्डसोबत पडताळणी केली जात आहेत.

याबाबत वारंवार जनजागृती करूनही सदस्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने प्रत्येकाने आधार कार्डचे सत्यापन करून घेणे सक्तीचे आहे. अन्यथा रेशन मिळणार नाही व नावे वगळल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित रेशन कार्ड धारकांची असेल, असा इशारा दिल्यावर नागरिकांची दुकानांवर तुडुंब गर्दी झाली आहे.कोटयापूर्वी रेशन कार्डला कुटुंब प्रमुखांचीच आधारची परत जोडण्यात आली होती मात्र यावेळी शासनाच्या निर्यायानुसार कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार कार्डची प्रत जोडणे अनिवार्य असल्याने नागरिकांनी लवकरात लवकर आधार कार्डच्या प्रति रेशन धान्य दुकानात जमा करावी.शरद घोरपडे, तहसीलदार, निफाडआम्ही तीन वर्षांपूवी रेशन धान्य दुकानात कुटुंबाप्रमुखासह सर्व सदस्यांची आधार कार्डची प्रत जमा केली होती मात्र यावेळी रेशन धान्य घेण्यासाठी गेलो असता पुन्हा आधारची प्रत मागण्यात आली. त्यामुळे आधारकार्डच्या किती प्रती जमा करायच्या, हेच कळत नाही प्रशासनाने या संदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे.- लाभार्थी, पिंपळगाव बसवंत.

टॅग्स :Governmentसरकारnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय