शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

आदिवासी भागात आदिवासीच कर्मचारी राज्यपालांचा फतवा : यंत्रणेकडून आढावा

By admin | Published: June 24, 2014 9:00 PM

आदिवासी भागात आदिवासीच कर्मचारी राज्यपालांचा फतवा : यंत्रणेकडून आढावा

नाशिक : आदिवासी भागात मूलभूत सोयी-सुविधा देण्याबरोबरच तेथील जनतेचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने यापुढे आदिवासी भागात आवश्यक असलेल्या शासकीय खात्यांमध्ये आदिवासी कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे, त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी राज्यपालांचे उपसचिव परिमलसिंह यांनी संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन यापुढे या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, अशा सूचना केल्या आहेत. विशेष करून तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, भूमापक, वन कर्मचारी, शिक्षक, कृषी सहायक अशा आदिवासींच्या जीवनमानाशी संबंधित असलेल्या शासकीय खात्यांचा समावेश आहे. आदिवासी दुर्गम भागात बिगर आदिवासी शासकीय कर्मचारी काम करण्यास धजावत नाहीत, परिणामी तेथील जनतेला योग्य त्या सुविधा व सोयी मिळण्यात अडचणीत निर्माण होतात. त्यामुळे अशा खात्यांमध्ये आदिवासी कर्मचाऱ्यांचीच भरती करून त्यांना तेथेच नेमणुका दिल्या जाव्यात, अशी सूचना राज्यपालांनी केली आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. उपसचिव परिमलसिंह यांनी, सर्वच खात्यांमध्ये आदिवासी विभागात रिक्त असलेल्या पदांचा आढावा घेतला. यापुढे रिक्त पदांची भरती करताना, आदिवासी भागांसाठी आदिवासी कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांच्यासह संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.