शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

४० दिवसांनंतरही नोटाबंदीची धग कायम

By admin | Published: December 22, 2016 12:25 AM

४२ दिवस उलटले : ‘एटीएम’चा शोध अजूनही सुरूच

नाशिक : नोटाबंदी होऊन ४२ दिवस झाले; मात्र अद्यापही शहरातील बाजारपेठांमध्ये नोटाबंदीची धग जाणवत आहे. ५० दिवसांमध्ये सर्व व्यवस्था सुरळीत होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले असले तरी आता आठवडाभरात असा काय चमत्कार होणार ? असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. बाजारपेठांमध्ये व्यवहार करण्यासाठी नागरिकांना अजूनही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. आॅनलाइन व्यवहार प्रणालीही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे गैरसोयीबरोबरच मनस्तापही सहन करावा लागत असल्याने ‘कॅश लेस’ व्यवहार करायचे तरी कसे असा सवाल संतप्त नागरिक करीत आहे. महिना अन् वर्षअखेरआठवडाभरानंतर डिसेंबरमहिन्याबरोबरच वर्षाचीही अखेर होणार आहे. यामुळे दैनंदिन व्यवहारांमध्ये अन्य महिनाअखेरच्या तुलनेत यावेळी जास्त वाढ होणार आहे. नागरिकांच्या खात्यात जमा होणाऱ्या पगाराची तसेच ज्येष्ठांच्या खात्यात जमा होणाऱ्या निवृत्तिवेतनाची रक्कम मिळविण्यासाठी पुन्हा तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महिन्याच्या शेवटी नागरिकांना पैशाची अधिक गरज भासते. घरगुती व्यवहारांबरोबरच वैद्यकीय व्यवहारही महिनाअखेरीस वाढतात कारण महिनाअखेरनंतर नागरिकांच्या हातात पैसे येतात; मात्र सध्या नोटाबंदीमुळे नागरिकांना पैशांची चणचण भासत आहे. डिसेंबर महिन्याच्या एक तारखेला नागरिकांना हक्काचा पगार काढण्यासाठी बॅँका व एटीएमबाहेर तासन्तास उभे राहावे लागले होते.