शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत, हरयाणातील पराभवावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
3
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
4
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
5
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
6
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
7
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
8
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
9
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
10
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट
11
जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्तींच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात! गेल्या निवडणुकीपर्यंत होता सर्वात मोठा पक्ष, पण आता...
12
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
13
बाहेरुन स्पा सेंटर पण...! जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला; मुलांसह ५ मुली ताब्यात, Video Viral
14
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
15
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
16
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
17
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
18
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
19
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
20
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव

निवडणूक आचारसंहितेनंतर शिक्षण क्षेत्रात भरती : तावडे

By admin | Published: January 17, 2017 12:05 AM

शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापकांच्या बैठकीत आश्वासन

नाशिक : राज्यात सध्या सुरू असलेली २०१६-१७ ची संचमान्यता तथा शिक्षण समायोजन प्रक्रिया मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतर राज्यातील विविध शाळांमध्ये रिक्त राहणाऱ्या पदांवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी परवानगी देण्याचे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. नाशिकमधील दंत महाविद्यालयात सोमवारी (दि. १६) दुपारी जिल्हा मुख्याध्यापक संघटना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या विविध समस्या समजावून घेतल्या. तसेच विविध शिक्षण संस्थाचालकांचीही त्यांनी यावेळी बैठक घेतली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अपूर्व हिरे, माजीमंत्री प्रशांत हिरे, भाजपाचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे आदि उपस्थित होते. मुख्याध्यापक व संस्थाचालकांच्या दोन्ही बैठकांमध्ये शिक्षणमंत्र्यांसमोर नवीन शिक्षक भरतीची मागणी प्रामुख्याने मांडण्यात आली. त्यावर तावडे यांनी चिपळूणकर समिती आणि शासनाचा शिक्षक व शिककेतर भरतीप्रक्रियेसंबंधी नियमावलीतून सुवर्णमध्य काढून रिक्त जागांवर भरतीची मान्यता दिली जाऊ शकते, असे संकेत देतानाच संस्थाचालकांना ही पदे मनमानी पद्धतीने भरता येणार नसल्याचेही स्पष्ट केले. शासनस्तरावर झालेल्या निवड चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांमधूनच संस्थांना शिक्षकांची भरती करता येणार असल्याचे सांगितले. तसेच गंथपाल, प्रयोगशाळा सहायक यांच्या भरतीवर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यात पदवीधर मतदार संघ निवडणुकीसह जिल्हा परिषद तथा मनपा निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याचे सांगत बहुतेक प्रश्न व समस्यांवर ‘बघू, करू’ अशी आश्वासने तावडे यांनी दिली. ‘बरे बोलू की खरे बोलू’ मुख्याध्यापक व संस्थाचालकांसोबत झालेल्या दोन्ही बैठकांमध्ये शिक्षणमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांनी विविध निर्णय योग्यरीतीने शालेय संस्था तसेच शाळांपर्यंत पोहोचवला नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली, तर संस्थाचालकांनीच अधिक ाऱ्यांना अनावश्यक सवयी लावल्याचे सांगत संस्थाचालकांनाही खडे बोल सुनावले. विविध गैरप्रकारांना हद्दपार करून यातून होणाऱ्या बचतीतून आयटी, संस्थांचे लाइट, घरभाडे, कला, संगीत, क्रीडाशिक्षण खर्चात वाढ करणे शक्य असल्याचे तावडे यांनी सांगितले. परंतु केवळ समाधान व्हावे म्हणून वेगवेगळी आश्वासनांनी दिशाभूल करणे योग्य नसल्याचे सांगताना ‘बरे बोलू की, खरे बोलू’ अशी उक्ती वापरून संस्थाचालक, मुख्याध्यापकांची विश्वासार्हता मिळविण्याचा प्रयत्न केला.