शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

दोषी ठरविल्याचे वृत्त कळताच आसारामबापू भक्तांना रडू कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:01 IST

आसारामबापू यांना जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविल्याचे वृत्त कळताच त्यांच्या भक्तांना अश्रू अनावर झाले. येथील आश्रमात सकाळपासून हजारो भाविकांनी हवन आणि जप सुरू केला होता. आसारामबापू यांना दिलासा मिळावा यासाठी भाविकांनी उपवास करीत ‘ओम नमो शिवाय:’ चा जप सुरू केला होता.

नाशिक : आसारामबापू यांना जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविल्याचे वृत्त कळताच त्यांच्या भक्तांना अश्रू अनावर झाले. येथील आश्रमात सकाळपासून हजारो भाविकांनी हवन आणि जप सुरू केला होता. आसारामबापू यांना दिलासा मिळावा यासाठी भाविकांनी उपवास करीत ‘ओम नमो शिवाय:’ चा जप सुरू केला होता. लैंगिक अत्याचार प्रकरणी बुधवारी सुनावणी होणार असल्यामुळे पहाटेपासून भाविकांनी येथील आश्रमात गर्दी गेली होती. सकाळपासून याठिकाणी भाविकांनी होमहवन आणि जपतप सुरू केले होते.  न्यायालयाने बापूंना दोषी ठरविल्यानंतर भाविकांना अश्रू आवरणे कठिण झाले. तरीही यावर विश्वास न ठेवता अहमदाबाद येथील मुख्य आश्रमातून अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत कोणत्याही वृत्तावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आश्रमाच्या संचालकांकडून भाविकांना करण्यात येत होते. निकाल काहीही लागला तरी भाविकांनी संयम राखावा, कुणीही रस्त्यावर उतरू नये, असे आवाहन भाविकांना केले जात होते. परंतु भाविकांची मानसिकता लक्षात घेऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले. सकाळी ६ वाजेपासून भाविक आश्रमाकडे येत होते. सकाळी सुरू झालेले पूजाविधी आणि धार्मिक कार्यक्रम दुपारपर्यंत अव्याहत सुरू होते. न्यायालयाच्या निर्णयाकडेदेखील सर्वांचे लक्ष होते. मात्र प्रसारमाध्यमांपेक्षाही अहमदाबाद येथील आश्रमाकडून येणाऱ्या निवेदनावरच विश्वास असल्याची भूमिका भाविकांनी घेतल्याने आश्रमाच्या निवेदनाकडे त्यांचे लक्ष होते. मात्र निकालाची माहिती मिळाल्यानंतर भाविकांना रडू कोसळले. दरम्यान, आश्रमात मात्र प्रसारमाध्यमांना परवानगी नाकारण्यात येऊन कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास मनाई करण्यात आली होती. भाविकांच्या भावना तीव्र असल्याने माध्यमांनी दूर राहण्याचा सल्ला आश्रमाच्या संचालकांकडून दिला जात होता.

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापू