शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

पाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:20 IST

मराठवाड्याला पाणी देण्यास भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला असून, प्रसंगी सर्वपक्षीय लढा उभारण्याची तयारी केली आहे. जायकवाडीतील वापरण्यायोग्य साठ्यासाठी सात टीएमसी पाण्याची गरज असून, गतवेळचा अनुभव बघता हे पाणी नाशिकमधून सोडले तरी बाष्पीभवनामुळे मराठवाड्यात पोहचणे कठीण आहे. त्यामुळे जायकवाडीच्या मृत पाणी साठ्यातून मराठवाड्याला पाणी द्यावे, अशी मागणीही फरांदे यांनी केली आहे.

नाशिक : मराठवाड्याला पाणी देण्यास भाजपा आमदारदेवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला असून, प्रसंगी सर्वपक्षीय लढा उभारण्याची तयारी केली आहे. जायकवाडीतील वापरण्यायोग्य साठ्यासाठी सात टीएमसी पाण्याची गरज असून, गतवेळचा अनुभव बघता हे पाणी नाशिकमधून सोडले तरी बाष्पीभवनामुळे मराठवाड्यात पोहचणे कठीण आहे. त्यामुळे जायकवाडीच्या मृत पाणी साठ्यातून मराठवाड्याला पाणी द्यावे, अशी मागणीही फरांदे यांनी केली आहे.  जायकवाडी धरणातील उपयुक्त साठ्यासाठी पाणी पडत असल्याने मेंढीगिरी समितीच्या शिफारशीनुसार नाशिक आणि नगरमधून पाण्याची मागणी होत आहे. त्यासंदर्भात औरंगाबाद येथे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक झाली आणि १२ टीएमसी पाणी सोडावे, अशी चर्चा करण्यात आली. यासंदर्भात, आमदार फरांदे यांनी पाणी सोडण्यास विरोध केला आहे. मुळातच जायकवाडी धरणाचा मृत पाणी साठा २६ टीएमसी इतका आहे. राज्यातील कोणत्याही धरणाचा इतका मृत साठा नाही. यावर्षी जायकवाडीच्या जलाशयात खरिपाचे पाणी धरून ४३.५ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. धरणाचा मृत साठ्याचा विचार केला तर धरणात ६९.५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. ते उद्योग आणि शेतीसाठी मुबलक आहे.परंतु खरीप हंगामातील १६ टीएमसी वापर झाल्याने सध्या ११ टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन असले तरी मुळात गेल्यावर्षी अशाच प्रकारे दहा टीएमसी पाणी नाशिकमधून सोडल्यानंतर ६० टक्के पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने पुरसे पाणी पोहोचले नव्हते त्यामुळे आता तरी सात टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचणे शक्य होणार नाही. यामुळे आता मृत साठ्यातील पाणीच वापरावे, अशी मागणी फरांदे यांनी केली आहे.जायकवाडी धरणातून यापूर्वीही गरजेनुसार मृत साठ्यातील पाण्याचा वापर करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर आताही मृत पाणी साठ्याचा वापर करावा, अशी मागणी प्रा. फरांदे यांनी केली आहे. जायकवाडी धरणात मृत साठ्याप्रमाणे कॉरीओव्हर स्टोअरेज नाशिकच्या गंगापूर धरण्यात यावे यासाठी महाराष्टÑ जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाला प्रा. फरांदे यांनी पत्र दिले आहे.

टॅग्स :WaterपाणीMLAआमदारDevyani Farandeदेवयानी फरांदेgangapur damगंगापूर धरण