शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

आंबेडकर नदीजोड प्रकल्पाचे आद्यप्रवर्तक

By admin | Published: February 01, 2016 11:25 PM

हरी नरके : जन्मशताब्दी महोत्सव समितीच्या कार्यक्रमप्रसंगी प्रतिपादन

नाशिक : भारताची प्रगती व सामाजिक जडणघडण व्हावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात कुटुंब नियोजन, वीज वितरण यांसह महानदी जोडप्रकल्प या विषयांवर भरीव कार्य केले असून, ते नदीजोड प्रकल्पाचे आद्यप्रवर्तक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य हरी नरके यांनी केले. पाथर्डी फाटा येथील विक्रीकर विभागाच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सव समितीतर्फे आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक युगप्रवर्तक’ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अपर विक्रीकर आयुक्त चित्रा कुलकर्णी, तर प्रमुख अतिथी सहविक्रीकर आयुक्त एच. ए. बाखरे, विक्रीकर आयुक्त बी. बी. राठोड उपस्थित होते. यावेळी बोलताना नरके म्हणाले, भारतातील मोठ्या धरणांपैकी १५ धरणांची निर्मिती व पूजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झालेले आहे. सद्यस्थितीत देशातील अनेक भागात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, अनेक ठिकाणी दुष्काळाची स्थिती आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान व पशुधनाची हानी होते. या धोक्याचा पूर्वानुमान करून आंबेडकर यांनी नदी जोडप्रकल्पाची अतिशय सखोल मांडणी केली असून, त्यामुळे विविध भागातील जमीन ओलिताखाली आणण्याची, तसेच प्राणी व नागरिकांच्या पाण्याचे नियोजन नदीजोड प्रकल्पामधून होऊ शकते, असे मत नरके यांनी व्यक्त केले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ एका धर्माचे, जातीचे नेते नसून ते एक जागतिक ताकदीचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळेच आजही सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कायम असल्याचे चित्रा कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, एच. ए. बाखरे यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)