शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

लोकप्रतिनिधींच्या तक्रार निवारणासाठी उपसमितीची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 01:28 IST

जिल्हा नियोजन समितीकडून निधी वाटपाबाबत लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या तक्रारींची दखल घेत पाच आमदार व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेली उपसमिती स्थापन करून त्याआधारे तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले, तर यापुढे शिल्लक निधीचे समान वाटप करण्याबरोबरच सुहास कांदे यांच्या मतदारसंघासाठी ७३ कोटींचा निधीही देण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समिती : निधीचे समान वाटप, कांदेंना ७३ कोटी

नाशिक : जिल्हा नियोजन समितीकडून निधी वाटपाबाबत लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या तक्रारींची दखल घेत पाच आमदार व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेली उपसमिती स्थापन करून त्याआधारे तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले, तर यापुढे शिल्लक निधीचे समान वाटप करण्याबरोबरच सुहास कांदे यांच्या मतदारसंघासाठी ७३ कोटींचा निधीही देण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन २०२०- २१ या वर्षासाठी शासनाने दिलेल्या एकूण निधीच्या ९६ टक्के निधी खर्च झाला असून, सन २०२१-२२ या वर्षासाठी ८६० कोटी ९५ लाख रुपयांचा नियतव्यय अर्थसंकल्पीत असून, त्यापैकी ५९२ कोटी एवढा निधी शासनाने बीडीएस प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीपैकी फक्त दहा टक्केच निधी खर्च करण्याचे शासनाचे आदेश असल्याने ऑक्टोबरअखेर ६२ कोटी ४२ लाख रुपये खर्च झाल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. वन खात्याला दिलेल्या निधीच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आल्या असून, त्यासंदर्भातील तक्रारींची चौकशी करण्यात येणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. मात्र, शासनाने निधी खर्चावर निर्बंध उठविल्याचे त्यांनी सांगितले. निधी वाटपावरून होणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन पाच आमदार व शासकीय अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली असून, ही समिती आपल्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी बैठका घेऊन धोरणात्मक निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मंगळवारी (दि.१६) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी ७३ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचा दावा सुहास कांदे यांनी केला असून, यापुढे सर्वच लोकप्रतिनिधींना निधीचे समान वाटप करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे ते म्हणाले.

चौकट====

मालेगावच्या आमदारांचे ‘वॉकआउट’

या बैठकीसाठी मालेगावचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती हे थोड्या उशिराने दाखल झाले. मात्र, काही वेळातच त्यांनी सभागृह सोडत बाहेरचा रस्ता धरला व सभागृहाबाहेर समर्थकांसह उभे राहिले. गेल्या दोन वर्षांपासून आपल्या मतदारसंघासाठी एक रुपयाही निधी मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. लोकप्रतिनिधींना निधी मिळणार नसेल, तर सभागृहात बसून काय उपयोग, असा सवाल करून आपण एमआयएमचे आमदार असल्यामुळे सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोपही आमदार मौलाना यांनी केला.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार