शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

शेतकऱ्यांनी किटकनाशके काळजीपूर्वक हाताळावी : कृषी विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:12 PM

शेतकऱ्यांनी विविध पिकांवर व फळबागांवर किटकनाशकांची फवारणी करतांना विषबाधा होऊ नये,  आणि गतवर्षी राज्यातील विविध भागात घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना किटनाशक काळजीपूर्वक हाताळण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी किटकनाशके काळजीपूर्वक हाताळावीविषबाधा टाळण्यासाठी कृषी आयुक्तांचे शेतकऱ्यांना आवाहन

नाशिक : शेतकऱ्यांनी विविध पिकांवर व फळबागांवर किटकनाशकांची फवारणी करतांना विषबाधा होऊ नये,  आणि गतवर्षी राज्यातील विविध भागात घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना किटनाशक काळजीपूर्वक हाताळण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे. शेतातील वेगवेगळ्या पिकात फवारणी करताना किटकनाशक नाक, त्वचा, तोंडाद्वारे शरीरात गेल्याने विषबाधा होत असल्याच्या घटना नाशिक जिल्ह्यातही  काहीवेळा घडलेल्या आहेत. त्यामुळे फवारणी करतांना शिफारशी प्रमाणे योग्य प्रमाणात किटकनाशकांचा वापर करावा. शिफारस नसतांना दोन व दोन पेक्षा जास्त किटकनाशकांचे मिश्रण करु न फवारणी करण्यात येऊ नये. किटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी संरक्षक कपडे, बुट, हातमोजे, नाकावरील मास्कचा वापर करावा. शरीरावर जखमा किंवा आजारी असल्यास फवारणी करणे टाळावे. अपघाताने विषबाधेची दुर्घटना घडल्यास तात्काळ प्रथमोचार करावेत व विनाविलंब बाधित रुग्णास जवळच्या दवाखान्यात घेऊन जावे अशा सुचना कृषी  आयुक्तालयातर्फे करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यातील सर्व किटकनाशके विक्रेत्यांनी किटकनाशकांची विक्री करतांना संरक्षीत किट उपलब्ध करुन देणे अनिवार्य असल्याच्या सूचना कृषी विभागाने केल्या आहेत. तसेच अतिरिक्त संरक्षीत किट विक्रीसाठीही उपलब्ध ठेवण्यात यावेत, असे निर्देश कृषी संचालकांतर्फे करण्यात आले आहेत 

मजुरांनाही संरक्षक किट द्याशेतकरी/शेतमालक मजूराकडून फवारणी करुन घेतात. अशावेळी शेतकरी/ शेतमालकाने नैतिक जबाबदारी पाळून फवारणी करणाºया शेतमजूरास संपूर्ण शरीर झाकले जाईल असे सरंक्षण किट्स द्यावे व फवारणी समक्ष करु न घेण्यात यावी. विषबाधेची लक्षणे दिसताच जवळच्या दवाखान्यात घेवून जावे. तसेच अशा विषबाधेची माहिती तात्काळ ग्रामपंचायत, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक व जवळच्या पोलिस स्टेशनला द्यावी असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे. 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकFarmerशेतकरी