शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

सिन्नर तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींसाठी ४८ अधिकाऱ्यांंची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 5:07 PM

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींची प्रशासकीय पातळीवर निवडणूकप्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामीण भागात राजकीय रणधुमाळीस प्रारंभ झाला असून, गटातटाच्या बैठका सुरू झाल्या आहेत. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत निवडणुकांना महत्त्व असल्याने गावातील युवकांनी कंबर कसले आहे. यावेळी सर्वच ठिकाणी अटीतटीच्या लढती होण्याची चिन्हे आहेत. तहसीलदार राहुल कोताडे यांनी ४८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना आपला ऑनलाइन अर्ज केवळ ५ दिवसांतच दाखल करावा लागणार आहे. तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींमधील ३३८ प्रभागांतील ९२० जागांसाठी सदस्यांची निवड होणार आहे. निवडणुकीचा कालावधी कमी असल्याने इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली असून, मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. मतदान व मतमोजणी पार पडल्यानंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढली जाणार असल्याने अनेकांची कोंडी झाली आहे. तसेच सदस्यांमधून सरपंच निवड होणार असल्याने त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाऊबंदकी व गटातटाला महत्त्व असल्याने उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच असते. उमेदवारांना आपला नामनिर्देशन अर्ज व घोषणापत्र अगोदर ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. त्यानंतर त्याची प्रिंट काढत त्यावर स्वाक्षरी करून हे नामनिर्देशन अर्ज दि. २३ ते ३० डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत दाखल करता येणार आहेत. मात्र २५, २६ व २७ डिसेंबर रोजी शासकीय सुटी असल्याने या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. प्रशासनानेही निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या संख्येइतक्याच सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ४८ टेबल मांडून ग्रामपंचायतींची जबाबदारीही संबंधित अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्ता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूकप्रक्रिया राबविली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत