शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

कॅशलेस व्यवस्थेमुळे वनविभाग अडचणीत

By admin | Published: January 16, 2017 1:29 AM

वनअधिकाऱ्यांपुढे पेच : पारंपरिक व्यवहारातील ‘अ‍ॅडव्हान्स’ पद्धत बंद पडणार

 नाशिक : वृक्षसंवर्धन आणि वनरक्षण करण्यासाठी वनविभाग ज्या मजुरांच्या भरवशावर निवांत आहे, त्या मजुरांना मोदी सरकारच्या कॅशलेस व्यवस्थेचा फटका बसल्याने शासनाचाच वनविभाग अडचणीत आला आहे. केवळ विश्वासाच्या भरवशावर उभा राहिलेला वनअधिकारी आणि वनमजूर यांच्यातील ‘अ‍ॅडव्हान्स’चा आर्थिक व्यवहार करणे आता अधिकाऱ्यांना धोक्याचा वाटू लागला आहे. त्यामुळे त्यांनी मजुरांना खिशातून अ‍ॅडव्हान्स देणे बंद केल्याने मजुरांकडूनही कामाला नकार मिळू लागला आहे. सामाजिक वनीकरण आणि वनविभागात वृक्षसंवर्धन आणि वृक्षलागवड ही महत्त्वाची कामे आहेत. वनरक्षणाचे काम वर्षभरासाठीचे असते तर वृक्षलागवडीसाठी जुलैपासून पुढे कामकाज केले जाते. याबरोबरच पाणी अडवा, पाणी जिरवा, वनतळे यांची देखरेख याबाबतची कामे वनमजुरांमार्फत केली जातात. स्थानिक मजूर असल्याने वनसंपत्ती जतन करण्यासाठी या मजुरांची मदत घेतली जाते. परंतु आता या वनमजुरांना काम देणे शासनाच्याच कॅशलेस भूमिकेमुळे अवघड होऊन बसले आहे. मजुरांना तत्काळ पैसे मिळणे अपेक्षित असते. परंतु शासनाकडून कामांना मंजुरी, मजुरीचे दर तसेच प्रत्यक्ष पैसे मिळेपर्यंत बराच वेळ लागतो. अशावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वत:च्या खिशातून मजुरांना अ‍ॅडव्हान्स देतात.